शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

सिटी कमांड सेंटर ठरणार स्मार्ट सिटीतील कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:42 AM

दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते.

मुरलीधर भवारकल्याण : दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते. कोरियन कंपनीच्या साह्याने कल्याण-डोंबिवलीही असे सिटी कमांड सेंटर उभे राहू शकते. त्याची पाहणी खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी नुकतीच केली. कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट करण्यात दक्षिण कोरियाने रस दाखवला असून तब्बल दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दाखवली आहे.शहर स्मार्ट होणार म्हणजे नेमके काय याची माहिती घेण्यासाठी, तसेच पालिकेने सापर्डे येथे ठरवलेले स्मार्ट शहर कसे असू शकेल याचे चित्र पाहण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा होता. सापर्डे येथे ७५० एकर जागेवर स्मार्ट सिटी प्रकल्प उभा राहणार आहे.कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर दक्षिण कोरियातील कंपनीशी एप्रिल महिन्यात सामंजस्य करार झाला. त्यानंतर तेथील विकास प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दौरा केला. त्या स्मार्ट सिटीतील काही प्रकल्प कल्याण-डोंबिवलीत उभारणे शक्य असल्याचे मत त्यांनी मांडले. कोरियात ३२ चौरस कि. मी. च्या परिसरात स्मार्ट सिटी उभारण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी नऊ चौरस कि. मी. च्या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तेथे बस स्टॉपवर उभे राहिल्यावर किती वेळात बस येईल, याची माहिती व्हॉटस्अ‍ॅपवर दिली जाते. त्या क्षणी ती बस कोणत्या स्टॉपवर आहे. तिला किती वेळ लागेल, याची माहिती मिळते, असे उदाहरण देवळेकर यांनी दिले. गरीब व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या स्मार्ट सिटीत घरे आहेत. ती भाड्याने, विकतही घेता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते हळबे यांनीही सिटी कमांड सेंटरबद्दल चांगले मत मांडले. त्यामुळे आपत्त्कालीन व्यवस्थापन चांगले होऊ शकते. आपल्याकडे नागरीकरण वाढल्यावर विकासाचा विचार केला जातो. कोेरियात हेच चित्र उलट्या स्वरुपात पाहावयास मिळते. आधी पायाभूत सुविधांचे जाळे विणून झाल्यावर नंतर शहरविकास व इमारत बांधण्याचे काम हाती घेतले जाते. त्यांनी ३२ चौरस किलोमीटर क्षेत्रात स्मार्ट सिटीचे काम सुरु केले आहे. त्यापैकी नऊ चौरस कि. मी. मध्ये काम पूर्ण झाले. त्याच धर्तीवर आपल्याकडे सापर्डे शहर विकसित करता येऊ शकते, असे त्यांनी सुचवले.सध्याची स्थिती काय?स्मार्ट सिटीत कल्याण-डोंबिवलीची निवड आॅगस्ट २०१६ ला झाली. पण गेल्या वर्षांत पाचच बैठका झाल्या. त्यावर एमएमआरडीएचे नियंत्रण आहे. केंद्र व राज्य सरकारकडून पालिकेस दोन टप्प्यात निधी आला. स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना पालिकेने एरिया बेस व पॅन सिटी अशा दोन भागात दोन हजार ३०० कोटींचा आराखडा तयार केला. त्यात २८ प्रकल्प आहेत. साडेतीन वर्षात ते उभारायचे आहेत. पण त्यातील एकही सुरू झालेला नाही. या प्रकल्पांत स्थानिक अधिकाºयांना रस नाही.