शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत

By सदानंद नाईक | Updated: April 28, 2025 21:15 IST

२५० सिंधी पाकिस्तानींचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज; आतापर्यंत १५० जणांना भारतीय नागरिकत्व

सदानंद नाईक, उल्हासनगर: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने शॉर्टटर्म पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करताच, शहरातील १७ सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानकडे प्रयाण केले. तर लॉंगटर्म व्हिसा घेतलेले २५० सिंधी पाकिस्तानी नागरिक शहरांत राहत असून भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती उघड झाली. भारतीय सिंधू सभा त्यांना मदत करीत असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी महेश सुखरामनी यांनी दिली.

काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर शॉर्टटर्म व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारत सरकारने रद्द केला. शहरांत शॉर्टटर्म व्हिसा घेऊन आलेल्या १७ पैकी १४ सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी रविवारी तर उर्वरित ३ नागरिकांनी सोमवारी पाकिस्तानकडे प्रयाण केले. मात्र लॉंगटर्म व्हिसा घेतलेल्या सिंधी पाकिस्तानी नागरिकांची संख्या शहरात २५० पेक्षा जास्त असल्याची माहिती उघड झाली. त्यासर्वांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून त्यापैकी काही जण ८ ते १० वर्षापासून शहरांत राहत आहेत. तर १५० जणांना गेल्या ६ वर्षात भारतीय नागरिकत्व मिळाले.

 देशाच्या फाळणी वेळी विस्थापित सिंधी बांधवासह अन्य समाज देशाच्या विविध विभागात वसला. शहरातील सिंधी समाजाचे नातेवाईक, भाऊ-बंधू आजही पाकिस्तान राहत आहेत. शहरातील सिंधी समाजाचे मूळ पाकिस्तान मध्ये असून नातेवाईक व भाऊबंधू तेथे असल्याने, त्यांची एकमेकांकडे सण व उत्सवा दरम्यान येणे-जाणे असते. भारतीय हिंदू सभेचे महेश सुखरामनी यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ३० ते ४० वर्षात शहरातील ३ हजार पेक्षा जास्त सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळाले. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेला वैद्यकीय व्हिसा, दीर्घकालीन व्हिसा, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा वगळता इतर सर्व व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून तात्काळ रद्द केले आहे.

छळाच्या कहाण्या 

जॅकेश ननजानी- जॅकेश यांच्या वडिलांचे पैश्यासाठी अपहरण झाल्यावर, पाकिस्तान मधील अल्पसंख्यावरील अन्यायाला वाचा फुटली. मुलांचे भवितव्य अंधारमय होऊ नये म्हणून जॅकेशच्या वडिलांनी कुटुंबासह लॉंग टर्म व्हिसा घेऊन भारत गाठले. जॅकेश यांच्या कुटुंबाला काही वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले. मात्र त्यांचे अन्य नातेवाईक आजही पाकिस्तान आहेत. 

दिलीप ऊतवानी- ऊतवानी यांच्या कुटुंबाचा बलूचिस्थान भागात कापड्याचा व्यवसाय होता. मात्र कुटुंबाला होत असलेल्या त्रासाच्या भीतीने, त्यांनी कुटुंबासह लॉंगटर्म व्हिसावर भारत गाठले. त्यांना गेल्याच वर्षी भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांचे नातेवाईकही पाकिस्तान असल्याचे दुःख आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतulhasnagarउल्हासनगर