शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत

By सदानंद नाईक | Updated: April 28, 2025 21:15 IST

२५० सिंधी पाकिस्तानींचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज; आतापर्यंत १५० जणांना भारतीय नागरिकत्व

सदानंद नाईक, उल्हासनगर: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने शॉर्टटर्म पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करताच, शहरातील १७ सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानकडे प्रयाण केले. तर लॉंगटर्म व्हिसा घेतलेले २५० सिंधी पाकिस्तानी नागरिक शहरांत राहत असून भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती उघड झाली. भारतीय सिंधू सभा त्यांना मदत करीत असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी महेश सुखरामनी यांनी दिली.

काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर शॉर्टटर्म व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारत सरकारने रद्द केला. शहरांत शॉर्टटर्म व्हिसा घेऊन आलेल्या १७ पैकी १४ सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी रविवारी तर उर्वरित ३ नागरिकांनी सोमवारी पाकिस्तानकडे प्रयाण केले. मात्र लॉंगटर्म व्हिसा घेतलेल्या सिंधी पाकिस्तानी नागरिकांची संख्या शहरात २५० पेक्षा जास्त असल्याची माहिती उघड झाली. त्यासर्वांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून त्यापैकी काही जण ८ ते १० वर्षापासून शहरांत राहत आहेत. तर १५० जणांना गेल्या ६ वर्षात भारतीय नागरिकत्व मिळाले.

 देशाच्या फाळणी वेळी विस्थापित सिंधी बांधवासह अन्य समाज देशाच्या विविध विभागात वसला. शहरातील सिंधी समाजाचे नातेवाईक, भाऊ-बंधू आजही पाकिस्तान राहत आहेत. शहरातील सिंधी समाजाचे मूळ पाकिस्तान मध्ये असून नातेवाईक व भाऊबंधू तेथे असल्याने, त्यांची एकमेकांकडे सण व उत्सवा दरम्यान येणे-जाणे असते. भारतीय हिंदू सभेचे महेश सुखरामनी यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ३० ते ४० वर्षात शहरातील ३ हजार पेक्षा जास्त सिंधी पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळाले. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेला वैद्यकीय व्हिसा, दीर्घकालीन व्हिसा, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा वगळता इतर सर्व व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून तात्काळ रद्द केले आहे.

छळाच्या कहाण्या 

जॅकेश ननजानी- जॅकेश यांच्या वडिलांचे पैश्यासाठी अपहरण झाल्यावर, पाकिस्तान मधील अल्पसंख्यावरील अन्यायाला वाचा फुटली. मुलांचे भवितव्य अंधारमय होऊ नये म्हणून जॅकेशच्या वडिलांनी कुटुंबासह लॉंग टर्म व्हिसा घेऊन भारत गाठले. जॅकेश यांच्या कुटुंबाला काही वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले. मात्र त्यांचे अन्य नातेवाईक आजही पाकिस्तान आहेत. 

दिलीप ऊतवानी- ऊतवानी यांच्या कुटुंबाचा बलूचिस्थान भागात कापड्याचा व्यवसाय होता. मात्र कुटुंबाला होत असलेल्या त्रासाच्या भीतीने, त्यांनी कुटुंबासह लॉंगटर्म व्हिसावर भारत गाठले. त्यांना गेल्याच वर्षी भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांचे नातेवाईकही पाकिस्तान असल्याचे दुःख आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतulhasnagarउल्हासनगर