शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका

By नितीन पंडित | Updated: January 2, 2024 19:39 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रईस शेख यांची बैठक संपन्न.

भिवंडी: भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी व होणारे अपघात या संदर्भात उपाय योजना करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी दिली आहे.

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यातच या मार्गाच्या दुरावस्थेमुळे व नियोजन शून्य कारभारामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असून या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाच्या मार्गावरील वाहतूक कोंडीतून व रस्ते अपघातातून येथील नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत दखल घेण्याची विनंती केली होती.आमदार रईस शेख यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकी मध्ये मंत्री दादा भुसे, मंत्री रवींद्र चव्हाण व इतर आमदार महोदय व अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत या महामार्गावर नागरिकांना होणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी, महामार्गावर होणारे अपघात महामार्गावरील खड्डे व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीबाबत व वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गावर एमएसआरडीसी आणि सार्वजनीक बांधकाम विभाग संगनमताने देखरेख करतील अशा सूचना पवारांनी दिल्या असून एमएसआरडीसी मार्फत अधिकचे वार्डन पुरविण्याचे निर्देश दिले असून येणाऱ्या काही दिवसामध्ये महामार्गावर पाहणी दौरा करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अशी माहिती आमदार शेख यांनी दिली असून या निर्णयांमुळे या मार्गावरीक वाहतूक कोंडी व अपघातातून नागरिकांची सुटका होणार असल्याचे आशा आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीAjit Pawarअजित पवार