शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका

By नितीन पंडित | Updated: January 2, 2024 19:39 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रईस शेख यांची बैठक संपन्न.

भिवंडी: भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी व होणारे अपघात या संदर्भात उपाय योजना करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी दिली आहे.

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यातच या मार्गाच्या दुरावस्थेमुळे व नियोजन शून्य कारभारामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असून या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाच्या मार्गावरील वाहतूक कोंडीतून व रस्ते अपघातातून येथील नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत दखल घेण्याची विनंती केली होती.आमदार रईस शेख यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकी मध्ये मंत्री दादा भुसे, मंत्री रवींद्र चव्हाण व इतर आमदार महोदय व अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत या महामार्गावर नागरिकांना होणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी, महामार्गावर होणारे अपघात महामार्गावरील खड्डे व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीबाबत व वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गावर एमएसआरडीसी आणि सार्वजनीक बांधकाम विभाग संगनमताने देखरेख करतील अशा सूचना पवारांनी दिल्या असून एमएसआरडीसी मार्फत अधिकचे वार्डन पुरविण्याचे निर्देश दिले असून येणाऱ्या काही दिवसामध्ये महामार्गावर पाहणी दौरा करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अशी माहिती आमदार शेख यांनी दिली असून या निर्णयांमुळे या मार्गावरीक वाहतूक कोंडी व अपघातातून नागरिकांची सुटका होणार असल्याचे आशा आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीAjit Pawarअजित पवार