शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पूर्वेच्या नागरिकांना अखेर मिळणार समान पाणी; अनेक वर्षांच्या पाणी समस्येतून होणार सुटका 

By धीरज परब | Updated: March 28, 2023 15:35 IST

पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जुन्या दाटीवाटीच्या रहिवासी भागात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर महापालिकेने नवीन १ हजार मिमी व्यासाची १७ कोटी खर्चून नवीन जलवाहिनी टाकली आहे . १ एप्रिल रोजी त्यातून पाणी पुरवठा सुरु होणार असल्याने येथील नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या तासांचे अंतर कमी होऊन पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे . 

भाईंदर पूर्वेस नवघर मार्ग परिसर , गोडदेव , शिर्डी नगर आदी अनेक दाटीवाटीच्या रहिवासी भागात गेल्या अनेक वर्षां पासून पाण्याची समस्या भेडसावत आहे . भाईंदर पूर्व भागातील नागरिकांना अन्य भागातील नागरिकां पेक्षा विलंबाने पाणी मिळत होते . शिवाय मिळणारे पाणी अपुरे असल्याने येथे सातत्याने पाणी समस्या भेडसावत होती . 

ह्या भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक सह शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक धनेश पाटील, दिनेश नलावडे , नीलम ढवण , अर्चना कदम , तारा घरत , प्रवीण पाटील , वंदना पाटील , जयंती पाटील स्नेहा पांडे , संध्या पाटील अनंत शिर्के आदींनी स्थानिक नागरिकांसह पालिके कडे पाठपुरावा , आंदोलने चालवली होती .  

कारण सदर भागात पालिकेचा पाणी पुरवठा हा ४२ ते ४४ तासांच्या अंतराने होत होता . तर अन्य भागात ३५ ते ३६ तासांनी पाणी दिले जात होते . त्यामुळे महापालिकेकडे नवीन मोठी जलवाहिनी तसेच अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्याची मागणी केली होती . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब गांभीर्याने घेत अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे यांना तांत्रिक बाबी तपासून उपायोजना करण्याचे निर्देश दिले होते . पालिकेने हटकेश जंक्शन पासून कनकिया उद्यान आरक्षण क्र . २६९ पर्यंत १३५० एमएम व्यासाची तर तिकडून इंद्रलोक जंक्शन पर्यंत १ हजार मिमी व्यासाची नवीन मोठी जलवाहिनी टाकली असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.

तर नवीन जलवाहिनीची चाचणी व जलवाहिनी धुण्याचे काम झाले असून १ एप्रिल पासून त्या नव्या जलवाहिनी द्वारे भाईंदर पूर्वेच्या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे . सदर जलवाहिनीची १७ कोटींचा खर्च आल्याची माहिती आ . सरनाईक यांनी दिली . 

शहरातील नागरिकांना समान पाणी मिळणे आवश्यक होते . मात्र भाईंदर पूर्वेच्या नागरिकांनी अनेक वर्ष पाणी वाटपात अन्याय सहन केला. आता नवीन जलवाहिनी मधून पाणी मिळून नागरिकांना समान पाणी मिळेल व येथील पाणी समस्या दूर होणार असल्याचे आ . सरनाईक म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक