शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भाईंदर पूर्वेच्या नागरिकांना अखेर मिळणार समान पाणी; अनेक वर्षांच्या पाणी समस्येतून होणार सुटका 

By धीरज परब | Updated: March 28, 2023 15:35 IST

पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जुन्या दाटीवाटीच्या रहिवासी भागात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर महापालिकेने नवीन १ हजार मिमी व्यासाची १७ कोटी खर्चून नवीन जलवाहिनी टाकली आहे . १ एप्रिल रोजी त्यातून पाणी पुरवठा सुरु होणार असल्याने येथील नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या तासांचे अंतर कमी होऊन पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे . 

भाईंदर पूर्वेस नवघर मार्ग परिसर , गोडदेव , शिर्डी नगर आदी अनेक दाटीवाटीच्या रहिवासी भागात गेल्या अनेक वर्षां पासून पाण्याची समस्या भेडसावत आहे . भाईंदर पूर्व भागातील नागरिकांना अन्य भागातील नागरिकां पेक्षा विलंबाने पाणी मिळत होते . शिवाय मिळणारे पाणी अपुरे असल्याने येथे सातत्याने पाणी समस्या भेडसावत होती . 

ह्या भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक सह शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक धनेश पाटील, दिनेश नलावडे , नीलम ढवण , अर्चना कदम , तारा घरत , प्रवीण पाटील , वंदना पाटील , जयंती पाटील स्नेहा पांडे , संध्या पाटील अनंत शिर्के आदींनी स्थानिक नागरिकांसह पालिके कडे पाठपुरावा , आंदोलने चालवली होती .  

कारण सदर भागात पालिकेचा पाणी पुरवठा हा ४२ ते ४४ तासांच्या अंतराने होत होता . तर अन्य भागात ३५ ते ३६ तासांनी पाणी दिले जात होते . त्यामुळे महापालिकेकडे नवीन मोठी जलवाहिनी तसेच अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्याची मागणी केली होती . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब गांभीर्याने घेत अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे यांना तांत्रिक बाबी तपासून उपायोजना करण्याचे निर्देश दिले होते . पालिकेने हटकेश जंक्शन पासून कनकिया उद्यान आरक्षण क्र . २६९ पर्यंत १३५० एमएम व्यासाची तर तिकडून इंद्रलोक जंक्शन पर्यंत १ हजार मिमी व्यासाची नवीन मोठी जलवाहिनी टाकली असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.

तर नवीन जलवाहिनीची चाचणी व जलवाहिनी धुण्याचे काम झाले असून १ एप्रिल पासून त्या नव्या जलवाहिनी द्वारे भाईंदर पूर्वेच्या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे . सदर जलवाहिनीची १७ कोटींचा खर्च आल्याची माहिती आ . सरनाईक यांनी दिली . 

शहरातील नागरिकांना समान पाणी मिळणे आवश्यक होते . मात्र भाईंदर पूर्वेच्या नागरिकांनी अनेक वर्ष पाणी वाटपात अन्याय सहन केला. आता नवीन जलवाहिनी मधून पाणी मिळून नागरिकांना समान पाणी मिळेल व येथील पाणी समस्या दूर होणार असल्याचे आ . सरनाईक म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक