शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
3
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
4
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
5
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
6
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
7
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
8
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
9
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
10
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
11
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
12
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
13
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
14
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
15
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
16
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
17
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
18
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
19
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
20
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

भाईंदर पूर्वेच्या नागरिकांना अखेर मिळणार समान पाणी; अनेक वर्षांच्या पाणी समस्येतून होणार सुटका 

By धीरज परब | Updated: March 28, 2023 15:35 IST

पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जुन्या दाटीवाटीच्या रहिवासी भागात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर महापालिकेने नवीन १ हजार मिमी व्यासाची १७ कोटी खर्चून नवीन जलवाहिनी टाकली आहे . १ एप्रिल रोजी त्यातून पाणी पुरवठा सुरु होणार असल्याने येथील नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या तासांचे अंतर कमी होऊन पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे . 

भाईंदर पूर्वेस नवघर मार्ग परिसर , गोडदेव , शिर्डी नगर आदी अनेक दाटीवाटीच्या रहिवासी भागात गेल्या अनेक वर्षां पासून पाण्याची समस्या भेडसावत आहे . भाईंदर पूर्व भागातील नागरिकांना अन्य भागातील नागरिकां पेक्षा विलंबाने पाणी मिळत होते . शिवाय मिळणारे पाणी अपुरे असल्याने येथे सातत्याने पाणी समस्या भेडसावत होती . 

ह्या भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक सह शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक धनेश पाटील, दिनेश नलावडे , नीलम ढवण , अर्चना कदम , तारा घरत , प्रवीण पाटील , वंदना पाटील , जयंती पाटील स्नेहा पांडे , संध्या पाटील अनंत शिर्के आदींनी स्थानिक नागरिकांसह पालिके कडे पाठपुरावा , आंदोलने चालवली होती .  

कारण सदर भागात पालिकेचा पाणी पुरवठा हा ४२ ते ४४ तासांच्या अंतराने होत होता . तर अन्य भागात ३५ ते ३६ तासांनी पाणी दिले जात होते . त्यामुळे महापालिकेकडे नवीन मोठी जलवाहिनी तसेच अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्याची मागणी केली होती . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब गांभीर्याने घेत अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे यांना तांत्रिक बाबी तपासून उपायोजना करण्याचे निर्देश दिले होते . पालिकेने हटकेश जंक्शन पासून कनकिया उद्यान आरक्षण क्र . २६९ पर्यंत १३५० एमएम व्यासाची तर तिकडून इंद्रलोक जंक्शन पर्यंत १ हजार मिमी व्यासाची नवीन मोठी जलवाहिनी टाकली असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.

तर नवीन जलवाहिनीची चाचणी व जलवाहिनी धुण्याचे काम झाले असून १ एप्रिल पासून त्या नव्या जलवाहिनी द्वारे भाईंदर पूर्वेच्या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे . सदर जलवाहिनीची १७ कोटींचा खर्च आल्याची माहिती आ . सरनाईक यांनी दिली . 

शहरातील नागरिकांना समान पाणी मिळणे आवश्यक होते . मात्र भाईंदर पूर्वेच्या नागरिकांनी अनेक वर्ष पाणी वाटपात अन्याय सहन केला. आता नवीन जलवाहिनी मधून पाणी मिळून नागरिकांना समान पाणी मिळेल व येथील पाणी समस्या दूर होणार असल्याचे आ . सरनाईक म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक