शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:08 IST

प्राधिकरण अपयशी; चिखलोलीतून सहा दशलक्ष लीटर पुरवठा बंद

अंबरनाथ : जीवन प्राधिकरणाने येथील चिखलोली धरणातून पाणी उचलणे बंद केल्याने त्याचा थेट फटका हा अंबरनाथ शहराला बसत आहे. थेट सहा दशलक्ष लीटर पाणी कमी झाल्याने प्राधिकरणाने एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ पूर्व भागाला वळविले आहे. त्यामुळे पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे चिखलोलीतून जो पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्या प्रमाणात एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळत नसल्याने पूर्व भागालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणी दूषित असल्याचे कारण पुढे करत प्राधिकरणाने धरणातून होणारा सहा दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा बंद केला. या धरणातून नवरेनगर आणि महालक्ष्मीनगर परिसरापर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्यावर या धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसीकडून अतिरीक्त सहा दशलक्ष लीटर पाणी घेणे गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी हे वाढीव पाणी देण्यास तयार नसल्याने आता उपलब्ध पाण्यावरच सर्व शहराची तहान भागविण्याचे काम प्राधिकरणाला करावे लागत आहे. मात्र, ते करत असताना शहराच्या दोन्ही भागांना मुबलक पाणी देण्यात प्राधिकरण सक्षम नाही. पश्चिम भागाला जो पुरवठा केला जात आहे, त्यातील दोन ते तीन दशलक्ष लीटर पाणी थेट पूर्व भागाला वळविण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.चिखलोली धरणाच्या पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यात प्राधिकरण सक्षमपणे काम करत नाही, तर दुसरीकडे एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी राजकीय प्रभाव पाडण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. वाढीव पाणी मिळत नसल्याने आता जावसई, फुलेनगर, कमलाकरनगर, कोहोजगांव, नालंदानगर, नारायणनगर या भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाकडे मुबलक पाणी नसल्याने प्राधिकरणाचे अधिकारीही हातवर करत आहेत. त्यामुळे या पाण्याच्या समस्येबाबत कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न पडला आहे.पाण्याचे नियोजन करण्यात प्राधिकरणाला अपयश आले आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी पाणी वळविण्याचे काम करीत आहेत. एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, तेच काम केले जात नाही.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याची समस्या ही आजची नाही. जीवन प्राधिकरणाने पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. पाणीपुरवठा वळविण्यात आल्याने पश्चिम भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.     - चरण रसाळ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई