शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:08 IST

प्राधिकरण अपयशी; चिखलोलीतून सहा दशलक्ष लीटर पुरवठा बंद

अंबरनाथ : जीवन प्राधिकरणाने येथील चिखलोली धरणातून पाणी उचलणे बंद केल्याने त्याचा थेट फटका हा अंबरनाथ शहराला बसत आहे. थेट सहा दशलक्ष लीटर पाणी कमी झाल्याने प्राधिकरणाने एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ पूर्व भागाला वळविले आहे. त्यामुळे पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे चिखलोलीतून जो पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्या प्रमाणात एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळत नसल्याने पूर्व भागालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणी दूषित असल्याचे कारण पुढे करत प्राधिकरणाने धरणातून होणारा सहा दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा बंद केला. या धरणातून नवरेनगर आणि महालक्ष्मीनगर परिसरापर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्यावर या धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसीकडून अतिरीक्त सहा दशलक्ष लीटर पाणी घेणे गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी हे वाढीव पाणी देण्यास तयार नसल्याने आता उपलब्ध पाण्यावरच सर्व शहराची तहान भागविण्याचे काम प्राधिकरणाला करावे लागत आहे. मात्र, ते करत असताना शहराच्या दोन्ही भागांना मुबलक पाणी देण्यात प्राधिकरण सक्षम नाही. पश्चिम भागाला जो पुरवठा केला जात आहे, त्यातील दोन ते तीन दशलक्ष लीटर पाणी थेट पूर्व भागाला वळविण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.चिखलोली धरणाच्या पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यात प्राधिकरण सक्षमपणे काम करत नाही, तर दुसरीकडे एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी राजकीय प्रभाव पाडण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. वाढीव पाणी मिळत नसल्याने आता जावसई, फुलेनगर, कमलाकरनगर, कोहोजगांव, नालंदानगर, नारायणनगर या भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाकडे मुबलक पाणी नसल्याने प्राधिकरणाचे अधिकारीही हातवर करत आहेत. त्यामुळे या पाण्याच्या समस्येबाबत कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न पडला आहे.पाण्याचे नियोजन करण्यात प्राधिकरणाला अपयश आले आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी पाणी वळविण्याचे काम करीत आहेत. एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, तेच काम केले जात नाही.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याची समस्या ही आजची नाही. जीवन प्राधिकरणाने पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. पाणीपुरवठा वळविण्यात आल्याने पश्चिम भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.     - चरण रसाळ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई