शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

अंबरनाथच्या नागरिकांची आता कचऱ्याच्या वर्गीकरणातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:22 AM

प्रकल्पामध्ये बदलापूरचाही समावेश : घंटागाडी चालकांचा वाचणार त्रास

अंबरनाथ : स्पेनच्या कंपनीसोबत अंबरनाथमध्ये घनकच-यावर प्रक्रिया करणारी मोठी यंत्रणा उभारली जाणार आहे. या कचरा प्रकल्पासाठी लागणारा कचरा हा ३०० टनापेक्षा जास्त अपेक्षित असल्याने एकट्या अंबरनाथसाठी हा प्रकल्प शक्य नाही. त्यामुळे आता अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांची एकत्रित कचरा प्रकल्प केंद्र उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्याचा प्रयत्न पालिकेचा सुरू आहे. मात्र नव्या प्रकल्पामुळे अंबरनाथकरांची समस्या सुटणार आहे. या प्रकल्पात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने नागरिकांना कचरा वेगळा करण्याची गरज भासणार नाही. तसेच घंटागाडी चालकांनाही आता तो त्रास कमी होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ पालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी अधिकाऱ्यांसह स्पेनमधील घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली होती. या संदर्भात माहिती देण्यासाठी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. खासदार शिंदे यांनी अंबरनाथमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. स्पेनच्या कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.अंबरनाथ शहरात रोज १५० टन कचरा एकत्रित केला जातो. मात्र प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कचºयाची क्षमता ही किमान ३५० टन अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी बदलापूर शहरालाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर शहरातून रोज सरासरी १०० टन कचरा एकत्रित केला जातो. त्यामुळे दोन्ही शहरांचा विचार करता सरासरी २५० टन कचरा एकत्रित होतो. त्यामुळे भविष्याची लोकसंख्या लक्षात घेऊन अंबरनाथमध्ये ३५० टन कचºयावर प्रक्रिया करता येईल एवढा मोठा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या आधीही अंबनाथ आणि बदलापूरसाठी एकत्रित कचरा प्रकल्प राबविण्यावर विचार झाला होता. मात्र त्यावर एकमत न झाल्याने दोन्ही पालिकांनी स्वतंत्र प्रकल्प तयार करण्याच्या अनुषंगाने काम सुरू केले होते. मात्र शिंदे यांनी मध्यस्थी करून या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या पालिकांच्या डम्पिंग ग्राउंडवर प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या संदर्भात अंबरनाथ पालिकेचे अधिकारी आणि कुळगाव-बदलापूर पालिकेचे अधिकारी यांच्या सोबत एक बैठकही झाली. या बैठकीत बलदापूर पालिकेने तत्वत: होकार दिला. तसेच बदलापूर पालिकेची साई वालिवली गावाजवळ १७ एकर डम्पिंगची जागा आहे तर अंबरनाथ पालिकेकडे जांभूळ गाव रस्त्यावर ३२ एकर जागा ही डम्पिंगसाठी प्रस्तावित आहे. या दोन्ही जागा अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असल्याने दोन्ही पालिकांना या ठिकाणी प्रकल्प राबविणे शक्य आहे.या प्रकल्पासाठी सरासरी ८० ते ९० कोटींचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पापैकी ५० टक्के खर्च ही संबंधित कंपनी करणार आहे. तर उर्वरित प्रकल्पाचा खर्च हा दोन्ही पालिकांना उचलावा लागणार आहे. या प्रकल्पावर निर्णय झाल्यास वर्षभराच्या आत हा प्रकल्प सुरू करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे नागिरकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.अंबरनाथमध्ये सीएनडी प्रकल्पही राबविणारच्कचºयासोबत शहरातील इमारतीच्या बांधकामाच्यावेळी किंवा इमारत तोडल्यावर बाहेर पडणारे डेब्रिज ही मोठी समस्या आहे. शहरात ते कुठेही पडलेले असते. त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाही तयार करण्यात येणार आहे.च्स्पेनच्या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा विचार सुरु आहे. मात्र हा प्रकल्प राबवितांना आवश्यक असलेले डेब्रिज हे कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून घेतले जाणार आहे. त्यासाठी इतर शहरांसोबत चर्चा करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.च् या प्रकल्पासाठी १० ते १५ कोटींचा अतिरीक्त खर्च अपेक्षित आहे. या डेब्रिजमधून वाळू, खडी, आणि दगडाची पावडर वेगळी करुन ती पालिकेच्या विविध विकास कामांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ