शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

पर्यावरणसंवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:37 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल : पर्यावरण दिनानिमित्त केली तीन हजार रोपांची लागवड

ठाणे : पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच खारफुटीची लागवड, वृक्षांचे पुनर्रोपण, प्लास्टिकपासून इंधननिर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रि या करणे आदी उपक्रम ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. शहर स्वच्छ ठेवणे, ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती माझी स्वत:चीदेखील जबाबदारी आहे, असा विचार जेव्हा नागरिक करतील, तेव्हाच खºया अर्थाने ठाणे शहर हे पर्यावरणाभिमुख होईल. महापालिका प्रशासन हे शहराचे एक चाक असून दुसरे चाक नागरिक आहे. त्यांनी महापालिकेस सहकार्य केले, तर भविष्यात पर्यावरण दिन खºया अर्थाने साजरा होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जागतिक पर्यावरणदिनी व्यक्त केला.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे करण्यात आले होते. या कार्यक्र मास स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका स्नेहा आंब्रे, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, ओमप्रकाश दिवटे, वर्षा दीक्षित, नगरअभियंता रवींद्र खडताळे यांच्यासह विविध संघटनांचे तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असताना विकासकामांत अडथळा ठरत असलेली झाडे न तोडता त्यांचे पुनर्रोपण केले जात आहे तसेच विकासकाने एक झाड तोडल्यास त्या बदल्यात त्याच्याकडून १५ झाडे लावून घेतली जात आहे. आजपर्यंत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ११ लाख झाडे लावण्यात आली आहेत. महापालिका घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करत आहे. येत्या दोन वर्षांत कचºयावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून कचरा समस्या सोडवणारे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदूषण विभागाच्या वतीने हरितवाटिका उभारणी, प्लास्टिक व थर्माकोल या वस्तूंना पर्यायी वस्तूंबाबत माहिती देणाºया अ‍ॅपचे, महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन कापडी पिशव्या तयार करणे, पाण्याची गुणवत्ता राखणाºया मशीनची उभारणी, शाश्वत ध्येयप्रणाली राबवणे, स्मार्ट वॉटर मीटर अ‍ॅप आदींचे उद्घाटन स्थायी समिती सभापती राम रेपाळे व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील पातलीपाडा येथील हिरानंदानी इस्टेट, लेक परिसर येथे तीन हजार विविध जातींच्या रोपांचे वृक्षारोपण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.