शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने नागरीक हैराण

By admin | Updated: October 6, 2015 23:52 IST

शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वहातूकीस अडथळा केला आहे. मात्र, एवढी अतिक्रमणे होऊनही मनपाचा

भिवंडी : शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वहातूकीस अडथळा केला आहे. मात्र, एवढी अतिक्रमणे होऊनही मनपाचा अतिक्रमण विभाग काही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांत संताप आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ, मंडई प्रभूआळी, पारनाका ते शिवाजी चौकापर्यंत चारचाकी वाहने रस्त्यात उभी करून त्यांचे मालक बाजारहाट करण्यासाठी जातात. फेरीवाले व हातगाडीवाल्यांनी हा रस्ता नेहमी व्यापलेला असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. यामधून नागरीकांना दुचाकी वहाने चालविणे कठीण झाले आहे. बीजेपी दवाखाना, पारनाका, भिवंडी टॉकिज, कासारआळी चौक व नझराना चौक येथे कायम वहातूक कोंडी असल्याने पाच मिनिटांचा हा रस्ता पार करण्यासाठी कधी कधी तर तब्बल अर्धा तास लागतो. तसेच मंडई ते आनंद दिघे चौक दरम्यान लाला शॉपिंग ते हनुमान बावडी, कोटरगेट मशीदजवळ वहातूक कोंडी होते. मंडई ते धामणकरनाका दरम्यान बोबडे कंपाऊण्डजवळ, धामणकरनाका ते एस.टी.दरम्यान कणेरी हत्ती सायझिंग समोर, राजीवगांधी चौक, जकातनाका, एस.टी.स्थानक या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. कल्याण रोडवर आजबीबी ते पाईपलाईन दरम्यान नेहमी वहातूक कोंडी होत असते. शहरातील या मुख्य मार्गावर बंद गाड्याही उभ्या असतात. तर कोठे फेरीवाल्यानी व हातगाड्यांनी अतिक्रमण केलेले असते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व शहर वाहतूक पोलीसांनी स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोवस्त घेऊन ही धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनीधी)उपायुक्तांचा प्रतिसाद नाही-महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कार्यान्वीत नसल्याच्या तक्रारीसाठी उपायुक्ता विजया कंठे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शहर वहातूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्ही.एन.कारकुट यांनी प्रत्यक्ष पहाणी करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या वहानांवर कारवाई केली आणि लवकरच या मार्गावर दुचाकी वहानांना तारखेनुसार पार्किंगसाठी अधिसूचना जाहिर करणार असल्याचे सांगीतले. -श्रावण महिना व गणेशोत्सवा दरम्यान या सर्व मार्गावर वहातूक कोंडी झाल्याच्या तक्रारी असताना मनपाने कोणतीही कारवाई केली नाही.तर वहातूक पोलीस गणेशोत्सवाच्या काळात दिसले. पुढे नवरात्रोत्सव व दिवाळी हे सण येत असल्याने शहर वहातूक पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्तीक कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.