शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दिल्लीतून पळालेलेली मुले पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:37 IST

दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी आणि अंश भूपेंद्र कुमार ही दोन्ही मुले वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. मुलांची माहिती मिळताच विमानाने दिल्ली ते मुंबई प्रवास करुन या पालकांनी मुलांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी केली चौकशीक्षुल्लक कारणावरुन सोडले घरबांद्रा ते ठाणे पायी केला प्रवास

ठाणे : क्षुल्लक कारणावरून दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी (१४) आणि अंश भूपेंद्र कुमार (१३) हे दोघेही वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. आपली मुले ठाण्यात असल्याचे समजल्यानंतर पालकांनी दिल्ली पोलिसांसमवेत ठाण्यात विमानाने येऊन आपल्या मुलांना कवेत घेतले.दिल्लीच्या मोदीबाग परिसरात राहणारी ही दोन्ही मुले क्षुल्लक कारणावरून राग आल्याने २८ आॅगस्ट २०१८ रोजी दिल्लीतून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेमध्ये बसले. २९ आॅगस्टला बांद्रा येथे उतरल्यानंतर त्यांनी पायीच ठाणे गाठले. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनसमोरील एका रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना एका नागरिकाने हटकले. त्यांची उलटसुलट उत्तरे ऐकून त्याने दोन्ही मुलांना वागळे इस्टेट पोलिसांकडे सोपवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या पथकाने चौकशी करून त्यांची माहिती काढली असता, ते दिल्ली येथून पळून आल्याचे समजले. दोघांपैकी एकाच्या आईने कुठे चोरी केली आहेस का, आता तुझे वडील रागावतील, इतकेच सुनावल्यानंतर त्या दोघांनी पळून जाण्याचा निश्चय केला. तिकडे दिल्ली येथील एका पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार २८ आॅगस्ट रोजी दाखल झाली होती. गव्हर्नमेंट बॉइज सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये नववीत शिकणा-या या मुलांचा शोध दिल्लीचे पोलीस उपनिरीक्षक अनुराग त्यागी यांचे पथक घेत होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यागी यांचे एक पथक मुलांच्या पालकांना घेऊन १ सप्टेंबर रोजी विमानानेच मुंबईत आले. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात उपेंद्र प्रसाद आणि हरिश्चंद्र पुरी या दोन्ही मुलांना शनिवारी रात्री आपल्या कवेत घेतले. त्यावेळी दोघांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही. दोघांकडेही फोन नव्हते. अशाही अवस्थेत ठाणे पोलिसांमुळे मुले सुखरूप मिळाल्याने दोघांच्याही पालकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस