शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

दिल्लीतून पळालेलेली मुले पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:37 IST

दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी आणि अंश भूपेंद्र कुमार ही दोन्ही मुले वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. मुलांची माहिती मिळताच विमानाने दिल्ली ते मुंबई प्रवास करुन या पालकांनी मुलांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी केली चौकशीक्षुल्लक कारणावरुन सोडले घरबांद्रा ते ठाणे पायी केला प्रवास

ठाणे : क्षुल्लक कारणावरून दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी (१४) आणि अंश भूपेंद्र कुमार (१३) हे दोघेही वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. आपली मुले ठाण्यात असल्याचे समजल्यानंतर पालकांनी दिल्ली पोलिसांसमवेत ठाण्यात विमानाने येऊन आपल्या मुलांना कवेत घेतले.दिल्लीच्या मोदीबाग परिसरात राहणारी ही दोन्ही मुले क्षुल्लक कारणावरून राग आल्याने २८ आॅगस्ट २०१८ रोजी दिल्लीतून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेमध्ये बसले. २९ आॅगस्टला बांद्रा येथे उतरल्यानंतर त्यांनी पायीच ठाणे गाठले. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनसमोरील एका रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना एका नागरिकाने हटकले. त्यांची उलटसुलट उत्तरे ऐकून त्याने दोन्ही मुलांना वागळे इस्टेट पोलिसांकडे सोपवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या पथकाने चौकशी करून त्यांची माहिती काढली असता, ते दिल्ली येथून पळून आल्याचे समजले. दोघांपैकी एकाच्या आईने कुठे चोरी केली आहेस का, आता तुझे वडील रागावतील, इतकेच सुनावल्यानंतर त्या दोघांनी पळून जाण्याचा निश्चय केला. तिकडे दिल्ली येथील एका पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार २८ आॅगस्ट रोजी दाखल झाली होती. गव्हर्नमेंट बॉइज सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये नववीत शिकणा-या या मुलांचा शोध दिल्लीचे पोलीस उपनिरीक्षक अनुराग त्यागी यांचे पथक घेत होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यागी यांचे एक पथक मुलांच्या पालकांना घेऊन १ सप्टेंबर रोजी विमानानेच मुंबईत आले. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात उपेंद्र प्रसाद आणि हरिश्चंद्र पुरी या दोन्ही मुलांना शनिवारी रात्री आपल्या कवेत घेतले. त्यावेळी दोघांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही. दोघांकडेही फोन नव्हते. अशाही अवस्थेत ठाणे पोलिसांमुळे मुले सुखरूप मिळाल्याने दोघांच्याही पालकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस