शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतून पळालेलेली मुले पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:37 IST

दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी आणि अंश भूपेंद्र कुमार ही दोन्ही मुले वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. मुलांची माहिती मिळताच विमानाने दिल्ली ते मुंबई प्रवास करुन या पालकांनी मुलांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी केली चौकशीक्षुल्लक कारणावरुन सोडले घरबांद्रा ते ठाणे पायी केला प्रवास

ठाणे : क्षुल्लक कारणावरून दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी (१४) आणि अंश भूपेंद्र कुमार (१३) हे दोघेही वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. आपली मुले ठाण्यात असल्याचे समजल्यानंतर पालकांनी दिल्ली पोलिसांसमवेत ठाण्यात विमानाने येऊन आपल्या मुलांना कवेत घेतले.दिल्लीच्या मोदीबाग परिसरात राहणारी ही दोन्ही मुले क्षुल्लक कारणावरून राग आल्याने २८ आॅगस्ट २०१८ रोजी दिल्लीतून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेमध्ये बसले. २९ आॅगस्टला बांद्रा येथे उतरल्यानंतर त्यांनी पायीच ठाणे गाठले. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनसमोरील एका रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना एका नागरिकाने हटकले. त्यांची उलटसुलट उत्तरे ऐकून त्याने दोन्ही मुलांना वागळे इस्टेट पोलिसांकडे सोपवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या पथकाने चौकशी करून त्यांची माहिती काढली असता, ते दिल्ली येथून पळून आल्याचे समजले. दोघांपैकी एकाच्या आईने कुठे चोरी केली आहेस का, आता तुझे वडील रागावतील, इतकेच सुनावल्यानंतर त्या दोघांनी पळून जाण्याचा निश्चय केला. तिकडे दिल्ली येथील एका पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार २८ आॅगस्ट रोजी दाखल झाली होती. गव्हर्नमेंट बॉइज सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये नववीत शिकणा-या या मुलांचा शोध दिल्लीचे पोलीस उपनिरीक्षक अनुराग त्यागी यांचे पथक घेत होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यागी यांचे एक पथक मुलांच्या पालकांना घेऊन १ सप्टेंबर रोजी विमानानेच मुंबईत आले. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात उपेंद्र प्रसाद आणि हरिश्चंद्र पुरी या दोन्ही मुलांना शनिवारी रात्री आपल्या कवेत घेतले. त्यावेळी दोघांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही. दोघांकडेही फोन नव्हते. अशाही अवस्थेत ठाणे पोलिसांमुळे मुले सुखरूप मिळाल्याने दोघांच्याही पालकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस