शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्याअगोदरच प्रशासनाने रोखला बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:56 IST

बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते.

कसारा - बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी बालविवाह केला जातो. असाच एक बोहल्यावर चढण्याअगोदरच होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. शहापूर येथील मोखवणेमध्ये बालविवाह होणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोखवणे येथे मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी दोन लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातील एक विवाह अल्पवयीन जोडप्यांचा होणार होता. 12 वर्षाची चिमुरडी व 18 वर्षाचा मुलगा यांचा विवाह होणार होता. परंतु या बालविवाहाची माहिती शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी व ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना मिळाली होती. 

मोखवणे येथील बालविवाहाची माहिती मिळताच दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने कसारा पोलीस ठाणे व मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना केल्या. तसेच  विवाहस्थळी पोहचून बालविवाह रोखण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठांचा आदेश मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांनी मोखवणे गाव गाठले व पोलीस पाटील पांडुरंग भोईर यांना सोबत घेऊन विवाह होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

12 वर्षाच्या मुलीला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून लग्न मंडपात आणण्याची तयारी सुरू होती. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा विवाह हा गावातील एका 18 वर्षाच्या मुलाशी होणार होता. मात्र विवाहाच्या ठिकाणी पोलीस व अन्य लोक आल्याने मांडवातील वऱ्हाडी व मुला-मुलीच्या नातेवाईकांचा एकच गोंधळ उडाला. समय सूचकता दाखवून आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केले व स्थानिक महिला, बचतगट, शिक्षक यांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. 

काही दिवसांपूर्वी उमरगा येथील एका कुटुंबाने १४ वर्षीय बालिकेचा विवाह निश्चित केला होता. मात्र, तत्पूर्वीच याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना कायद्याची माहिती दिली. तब्बल 7 तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ते कुटुंब बालविवाह थांबविण्यास राजी झाले अन् ‘त्या’ अल्पवयीन मुलीची बालदिनी बालविवाहातून सुटका झाली. संबंधित कुटुंबाने 20 नोव्हेंबरला विवाह नियोजित केल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीस मिळाली होती. समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस