शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

बोहल्यावर चढण्याअगोदरच प्रशासनाने रोखला बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:56 IST

बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते.

कसारा - बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी बालविवाह केला जातो. असाच एक बोहल्यावर चढण्याअगोदरच होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. शहापूर येथील मोखवणेमध्ये बालविवाह होणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोखवणे येथे मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी दोन लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातील एक विवाह अल्पवयीन जोडप्यांचा होणार होता. 12 वर्षाची चिमुरडी व 18 वर्षाचा मुलगा यांचा विवाह होणार होता. परंतु या बालविवाहाची माहिती शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी व ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना मिळाली होती. 

मोखवणे येथील बालविवाहाची माहिती मिळताच दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने कसारा पोलीस ठाणे व मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना केल्या. तसेच  विवाहस्थळी पोहचून बालविवाह रोखण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठांचा आदेश मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांनी मोखवणे गाव गाठले व पोलीस पाटील पांडुरंग भोईर यांना सोबत घेऊन विवाह होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

12 वर्षाच्या मुलीला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून लग्न मंडपात आणण्याची तयारी सुरू होती. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा विवाह हा गावातील एका 18 वर्षाच्या मुलाशी होणार होता. मात्र विवाहाच्या ठिकाणी पोलीस व अन्य लोक आल्याने मांडवातील वऱ्हाडी व मुला-मुलीच्या नातेवाईकांचा एकच गोंधळ उडाला. समय सूचकता दाखवून आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केले व स्थानिक महिला, बचतगट, शिक्षक यांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. 

काही दिवसांपूर्वी उमरगा येथील एका कुटुंबाने १४ वर्षीय बालिकेचा विवाह निश्चित केला होता. मात्र, तत्पूर्वीच याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना कायद्याची माहिती दिली. तब्बल 7 तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ते कुटुंब बालविवाह थांबविण्यास राजी झाले अन् ‘त्या’ अल्पवयीन मुलीची बालदिनी बालविवाहातून सुटका झाली. संबंधित कुटुंबाने 20 नोव्हेंबरला विवाह नियोजित केल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीस मिळाली होती. समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस