शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"मुख्यमंत्री साहेब तुम्हीच शेवटचा आधार, खाजगी शाळांच्या छळापासून वाचवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:03 IST

मीरा भाईंदरमधील पालकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे; खाजगी शाळांच्या मनमानी फी वसुलीविरुद्ध पालक उतरले रस्त्यावर

मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे आधीच आमच्या नोकऱ्या - व्यवसाय बंद असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे . शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिकवण्याच्या आड पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापना कडून गलेलठ्ठ फी साठी तगादा लावून आमच्या मुलांना व आम्हाला वेठीस धरून छळ केला जात आहे . येथील लोकप्रतिनिधी - अधिकारी यांना सांगून देखील न्याय मिळत नसल्याने आता तुम्हीच शेवटचा आधार आहेत असे साकडे मीरा भाईंदर मधील पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . 

मीरा भाईंदर मधील विविध मोठ्या खाजगी शाळांच्या पालकांनी आज सोमवरो शाळांच्या बाहेर जमून आपला संताप व्यक्त केला . कोरोना संकटा मुळे आमच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय ठप्प झाला आहे . आमची अक्षरशः होरपळ चालली आहे . या आधी आम्ही या शाळांनी मागितल्या तेवढ्या लाख लाख रुपयांच्या फी भरल्या आहेत . पण आता फी भरणे अशक्य झालेले आहे . शाळांनी तर लेट फी सुद्धा आकारली आहे . 

आम्हा पालकांना विविध प्रकारे घाबरवले जातेय . ज्यांनी फी भरली त्यांच्या साठी ऑनलाईन वर्ग सुरु केले . परीक्षा घेतल्या जात आहेत . ज्यांना फी भरता आली नाही त्यांच्या मुलांना ओलनलाईन शिक्षण नाही व परीक्षा देखील नाही . दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील फी न भरल्याने अभ्यास बंद केला आहे . काही शाळा तर पालकां कडून हमीपत्र लिहून घेत आहेत . काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी , मिसलेनियस शुल्क अजूनही आकारत आहेत . ज्या पालकांनी फी कमी करा म्हणून शाळांना ईमेल केला त्यांना शाळेच्या वकीला मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहे . 

शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे . ऑनलाईन शिकण्यासाठी आमची मुलं घरातूनच अभ्यास करणार व त्यांचा त्यासाठी लागणारा सर्व खर्च देखील पालकच करणार आहेत . शाळा बंद आहेत पण तरी देखील शाळेचे व्यवस्थापन मात्र संपूर्ण वर्षाची आणि पूर्वी प्रमाणेच फी भरण्याचा तगादा लावत आहे . 

आम्ही स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्स्ना हसनाळे , शिक्षणअधिकारी उर्मिला पारधी , पालिका आयुक्त व अधिकारी आदीं कडे तक्रारी केल्या , गाऱ्हाणी मांडली . पण कोणी दाद दिली नाही . पारधी यांनी तर तुम्ही आणि तुमची शाळा काय ते बघून घ्या असे सांगून उत्तर दिले . 

अश्या बिकट परिस्थिती मध्ये आता मुख्यमंत्री तुमचाच शेवटचा आधार आहे . आम्हाला व आमच्या मुलांना वाचवा . त्यांना शिक्षणा पासून वंचित होऊ देऊ नका असे साकडे या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . शाळांची सरसकट ५० टक्के फी कमी करा . फी भरली नाही म्हणून मुलांचे शिक्षण थांबवू नका अशी विनंती पालकांनी केली आहे . 

टॅग्स :SchoolशाळाUddhav Thackerayउद्धव ठाकरे