शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

केडीएमसीतील २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:09 IST

फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. त्याचप्रमाणे, शहरीकरण झालेली लगतची नऊ गावे मात्र महापालिका क्षेत्रात असतील, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. अखेर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनाद्वारे या गावांबाबतचा निर्णय जाहीर केला. २७ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबत स्थानिकांकडून मागणी केली होती. त्यानंतर, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातून २७ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्यासाठी अधिसूचना जाहीर करत, त्याबाबत हरकती, सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार, कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचना दाखल करण्यात आल्या आणि ११ व १२ मार्च रोजी आयुक्तांनी त्यावर सुनावणी घेतली. कोकण विभागीय आयुक्तांनी १३ मार्च रोजी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शीळ कल्याण रस्त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्यामुळे ही नऊ गावे महानगरपालिका क्षेत्रात कायम राहणार असून, इतर अठरा गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ही ९ गावे राहणार केडीएमसीतआजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडास्वतंत्र नगरपरिषदेत समाविष्ट होणारी गावे : घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे