शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुख्यमंत्री साहेब! हुक्का पार्लर, बार मात्र जोरात सुरु आहेत; आमदार संजय केळकर यांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 12:40 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डान्सबार, हुक्का पार्लर, पब, परमिट रूम कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. मध्यंतरी लॉकडाऊन असताना एक वृत्त वहिनीने रात्रभर सुरू असलेल्या डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश करण्यात केला होता.

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना एकीकडे भर रस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जाते तर दुसरीकडे कायदे मोडून सुरू असलेल्या येऊर आणि घोडबंदर परिसरातील हुक्का पार्लर, डान्स बार, पब चालकांना सतरंजी अंथरल्या जात आहे. या विरोधात तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई होत असल्याने कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डान्सबार, हुक्का पार्लर, पब, परमिट रूम कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. मध्यंतरी लॉकडाऊन असताना एक वृत्त वहिनीने रात्रभर सुरू असलेल्या डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश करण्यात केला होता. त्यानंतर काही अधिकाऱ्यांवर जुजबी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा हे अवैध धंदे सुरू आहेत. रेल्वे स्थानक, वागळे इस्टेट, येऊर, घोडबंदर आदी भागात कोरोनाचे नियम डावलून रात्रभर आणि पहाटे चार वाजेपर्यंत डान्स बार, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. काही वेळा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे या बाबी उघडकीस आणल्या जातात. त्यावर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई होते, परंतु या प्रकरणी अधिकाऱ्यांवरच जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे आमदार केळकर यांनी पत्रात म्हटले आहे. 

पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना अवैध धंद्यांची ही ठिकाणे माहीत असतात, तरीही त्यावर कारवाई केली जात नाही. कोणाच्या दबावाखाली ही कारवाई होत नाही? कोणाच्या संगनमताने हे व्यवसाय सुरू आहेत? हप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही? असे अनेक प्रश्न जागरूक नागरिकांना पडले आहेत. तक्रार करणाऱ्यांवरच दबाव टाकला जातो किंवा त्यांना मारहाण करून त्यांचा आवाज दाबला जातो. ही बाब अत्यंत गंभीर आहे.  एकूणच कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी शासनाने जनहितासाठी वेळीच आशा पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.