शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरोधी पक्षनेतेपदासाठीच विरोधकांंत चुरस - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 00:25 IST

राजकीयदृष्ट्या शरद पवार यांची वाईट अवस्था आहे. काँग्रेसने आधीच हार पत्करली आहे.

ठाणे / उल्हासनगर/पेण : या निवडणुकीत चुरस नसल्याने , काँग्रेसने हार मानल्याने आता विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.राजकीयदृष्ट्या शरद पवार यांची वाईट अवस्था आहे. काँग्रेसने आधीच हार पत्करली आहे. त्यामुळे द्रष्टेपणाने सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचा सल्ला दिल्याची टीकाही त्यांनी ठाण्याच्या सभेत केली. ठाण्यासाठी अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.सक्षम वाहतुक व्यवस्था, दळणवळणाच्या सोयी, जलवाहतूक- मेट्रो- मोनो- बस ही वाहतुकीसाठी एक तिकीट, मेट्रोचे जाळे हे मुद्दे त्यांनी मांडले. कल्याण डोंबिवली हायब्रीड मेट्रो उभारणार, ठाणे ते बोरीवली रोप वे यांच्यासह पाच हजार ४०० कोटींच्या मंजूर प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला.निवडणुकीनंतर पेण-वाशी-खारेपाटाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून येथील जी प्रलंबित समस्या आहे, त्याचे समाधान खारेपाटातील जनतेला मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी पेणच्या सभेत दिले. एमएमआरडीए अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून वाशी-खारेपाटासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पण शेकापसारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, हे हास्यास्पद आहे. पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणच्या विकासासाठी एमएमआरडीएचा खजिनाच रिकामा करणार असल्याचे आश्वासनही दिले.उल्हासनगरात मेट्रो आणून, त्या स्टेशनला सिंधुनगर नाव देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी तेथील सभेत दिले. शहराचे आधुनिकीकरण करणे, मेट्रो ट्रेन सुरु करणे, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे व धोकादायक इमारतींना वाढीव ४ चटईक्षेत्र देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. पालिकेत भाजपसोबत सत्तेत असलेली ओमी कलानी टीम व त्यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी मौन बागळले. महायुतीतील रिपाइंची बंडखोरी थांबविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले नाही. रिपाइंचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनीही यावेळी बंडखोरीबाबत शब्दही काढला नाही.

टॅग्स :thane-acठाणे शहरulhasnagar-acउल्हासनगरpen-acपेणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस