शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाच बसला फटका; तब्बल अडीच तास ठाण्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 14:47 IST

वाहतूक कोंडीचा त्रास खुद्द मंत्र्यांनाच बसला असून, केवळ ठाण्यात तब्बल दोन ते अडीच तास घालवावे लागले. 

विशाल हळदे, लोकमत

ठाणे: सामान्य प्रवासी आणि ट्रॅफिक यांचे अतूट नाते असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण या भागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाताना पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीने ठाण्यात कहर गाठताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीचा त्रास खुद्द मंत्र्यांनाच बसला असून, केवळ ठाण्यात तब्बल दोन ते अडीच तास घालवावे लागले. 

या मंत्र्यांचे नाव आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ.छगन भुजबळ मुंबईहून ठाणेमार्गे नाशिक जात होते. मात्र, ठाण्यात तीन हातनाका ते अगदी मानकोली फाटा, कल्याण फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झालेली होती. याचा सामना छगन भुजबळ यांनाही करावा लागला. ठाण्यातून बाहेर पडेपर्यंत छगन भुजबळ तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले होते. छगन भुजबळांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तसेच वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांना खूपच कसरत करावी लागली, असे सांगितले जात आहे. 

केवळ खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा

रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना गेले अनेक दिवस करावा लागत आहे. मुंबईहून नाशिककडे जाणारा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतो. या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. खुद्द एकनाथ शिंदे ठाण्यात राहतात. मात्र, तरीही ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याचे सांगितले जात आहे. 

वाहतूक पोलिसांची खड्डे बुजवण्यास सुरुवात

खड्ड्यांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता शेवटी कापूरबावडी वाहतूक विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कदम, पोलिस नाईक नीलेश गरजे, बसवराज पाटील, तायडे तसेच पोलीस हवालदार कांदे यांनी हातात कुदळ, फावडा घेऊन रॅबिट टाकून खड्डे बुजवायला सुरुवात केली. 

टॅग्स :thaneठाणेChhagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस