शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांसमोर युतीच्या गनिमीकाव्याचे आव्हान, शिवसेनेची नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:50 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्तीची मते मिळाली

- अजित मांडकेकल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्तीची मते मिळाली असल्याचे लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अतिशय अवघड जाणार असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या मतांमध्ये तब्बल १४ हजार ५५१ मतांची निर्णायक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना ७७ हजार ३३६ मते मिळाली असून मागील वेळेस राष्ट्रवादीला ६५ हजार १६० मते मिळाली होती. त्यात यंदा केवळ १२ हजार १७६मते जास्तीची मिळाली आहेत. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये राष्ट्रवादीच्या मतांच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू असून मागील वेळेप्रमाणे पुन्हा एमआयएमला येथे उमेदवारी देऊन मतांचे विभाजन करून शिवसेना येथून शिवसेना आव्हाडांना आव्हान देऊ शकते. तशी रणनीती आतापासूच सुरू झाली असून असे झाल्यास राष्टÑवादीला कळवा-मुंब्य्राचा गड राखणे कठीण जाणार आहे.कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे कळव्यातून ८, मुंब्रा, दिवा भागातून २१ नगरसेवक निवडून आले. तर कळव्यातील आणि मुंब्य्रातील दोन अपक्ष नगरसेवकांनीही राष्टÑवादीबरोबर घरोबा केला आहे. यामुळे राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. तर शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसल्याचे दिसून आले. कळव्यात शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये एकने घट होऊन त्यांची संख्या सात आली आहे. तर मुंब्य्रात शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. दिव्यात मात्र भाजपची लाट असतानाही त्याठिकाणी आठही जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे ही शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरली.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या राष्टÑवादीला ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. तर काँग्रेसला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. शिवसेनेला येथून ३८ हजार ८५० मते मिळाली होती, तर एमआयएमला येथून १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मते मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत यात शिवसेनेला या मतदारसंघातून ६७ हजार ४५५ मते मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचेच दिसत आहे. राष्टÑवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना या मतदारसंघातून ७७ हजार ३३६ मते मिळाली. पण विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत त्यात नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्टÑवादीला हा धक्का मानला जात आहे. ंशिवाय, या निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार हा निर्णायक भूमिकेत असणार आहे. मागील निवडणुकीत मनसे लढली असली तरी यंदा मात्र त्यांच्या मतांचा फायदा हा राष्टÑवादीच्या उमेदवाराला होईल, असा अंदाज होता; पण तसे काही या मतदारसंघात घडल्याचे दिसले नाही. त्यामुळे ही राष्टÑवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे मागील वेळेस जी खेळी शिवसेनेने केली होती, तशीच काहीशी खेळी आगामी विधानसभा निवडणुकीत खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंब्य्रातून एमआयएमचे कार्ड चालवायचे आणि राष्टÑवादीच्या मतांमध्ये फूट पाडायची आणि कळव्यातून पुन्हा शिवसेनेचा उमेदवार उभा करून त्याने कळव्यातील मते घ्यायची अशी रणनीती आखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. पण औरंगाबाद पॅर्टनही येथे चालला तर एमआयएमला त्याचा फायदा होऊनसेनेचा उमेदवार पडूही शकतो.>की फॅक्टर काय ठरला?या विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मजबूत पकड असल्याचे मान्य केले असले तरी शिवसेना आणि भाजप येथे एकत्रपणे काम करताना दिसली. त्याचाच परिणाम म्हणून येथून १४ हजार ५५१ मतांची निर्णायक आघाडी शिवसेनेला घेता आली. या पट्ट्यात कळवा आणि मुंब्रा हा भाग येत असला तरी दिव्यावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्याचा फायदा शिवसेनेच्या वाढीव मतांवर झाल्याचे दिसले.या मतदारसंघात आव्हाडांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा परिणाम म्हणूनच बाबाजी पाटील यांना ७७ हजाराहून अधिकची मते या मतदारसंघातून घेता आली आहेत.>विधानसभेवर काय परिणाममागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला होता. पण त्याचा फारसा परिणाम त्यांच्या मतांवर झाल्याचे दिसून आले नाही. उलट त्यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आता वंचित आघाडीचा फॅक्टर हा इतर ठिकाणी चालल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा कसा घेता येईल यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असणार आहेत. तसे झाल्यास राष्टÑवादीला हा गड राखण्यासाठी कसरत करावी लागेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड