शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले!

By सुरेश लोखंडे | Updated: June 23, 2024 19:37 IST

या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली.

ठाणे : जिल्ह्यातील शहरांजवळच्या व महामार्गाच्या बाजूला असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा ही समस्या गंभीर झाली आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करण्याची गरज हेरून ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन या कचरा समस्येचे गांभीर्य जाणून घेत त्यावर वेळीच उपाययाेजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

             या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली. या कचऱ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विविध प्रकारे विल्हेवाट करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा घुगे यांनी या भेटी दरम्यान गांवांमधील रहिवाश्यांकडून केली आहे. या दाैर्या प्रसंगी घुगे यांनी भिवंडी तालुक्यातील हायवे लगतच्या दिवे अंजुर, मानकोली, वडपे, पडघा आणि कोण या ग्रामपंचायतींना भेट दिली.             शहापूर तालुक्यातील बोर शेती, वाफे आणि चेरपोली ग्रामपंचायत भेट देऊन तेथील डम्पिंग ग्राउंडची पहाणी केली. शहापूर तालुक्यातील दहिगाव येथील जेएसडब्ल्यू अंतर्गत कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास देखील त्यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, भिवंडीचे बीडीओ डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता रमेश सासे आदी उपस्थित होते.

             कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप ग्रामपंचायतींलाही घुगे यांनी भेटी देऊन येथील नाला सेतू ट्रीटमेंट प्लांटचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. वरप ग्रामपंचायत अंतर्गत तात्काळ कचरा संकलन केंद्र उभारणीसाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना देण्यात आल्या. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत नेवाळी व उसाटणे येथे भेट देण्यात आली. उसाटणे येथील कचरा व्यवस्थापन केंद्राचे कामकाज वेळेत पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत नेवाळी येथे घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नेवाळी नाका येते कचरा टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या. 

 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नthaneठाणेambernathअंबरनाथ