शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

ठाण्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, सोन्याचा नारळ अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 04:17 IST

दर्याला सोन्याचा नारळ अर्पण : खाडीकिनारी आगरी-कोळी-बांधवांचा जनसागर, पारंपरिक नृत्यांवर धरला ठेका

ठाणे : ठाणे महापालिकेने नारळी पौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दर्याची पूजा करून शहराचा मानाचा नारळ दर्याला अर्पण केला. यावेळी कळवा खाडीकिनारी जत्रेचे स्वरूप आले होते. यामुळे कळवा पुलावरील वाहतुकीत बदल केला होता.

यावेळी नागरिक तसेच कोळी-आगरी-बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगरी-कोळी लोककलेवर आधारित एका सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजनही यावेळी केले होते. पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी मासेमारी सुरू करण्यापूर्वी दर्याराजाला शांत करण्यासाठी आगरी-कोळी-बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मानाचा सोन्याचा नारळ अर्पण करून हा उत्सव साजरा करतात. पारंपरिक कोळीगीतांवर ठेका धरून दर्यासागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा सण कळवा खाडी परिसरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. दुपारपासूनच कोर्टनाक्याहून कळवा खाडी ब्रिजवर जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. या ठिकाणी भरलेल्या जत्रेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन महिने विश्रांती घेतलेल्या नौका रंगरंगोटी करून पुन्हा खाडीत उतरवण्यात आल्या. यावेळी खाडीची विधिवत पूजा करण्यात आली. सणाच्या आनंदाबरोबरच यंदा भरपूर मासे मिळून चांगला व्यापार होऊ दे आणि सुखशांती मिळू दे, असे साकडे कोळीबांधवांनी दर्यासागराला घातले.

दरम्यान, दुपारपासूनच कळवा खाडीवरील वाहतूक बंद केली होती. आधीच या पुलाच्या ठिकाणी तिसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने कोंडी होत आहे. त्यात शनिवारी या सणानिमित्त वाहतूक बंद करून ती इतरत्र वळवल्याने विटाव्याकडून येणारी वाहतूक कळवानाक्यापर्यंतच येऊन ठेपली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे व चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मीठबंदर रोड येथील कस्टम जेट्टी-विसर्जन घाट याठिकाणी यंदाही पारंपरिक सतराव्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने सवाद्य शोभायात्रेचे कोळी वेशभूषेत आयोजन करण्यात आले. सोन्याचा नारळ विधिवत दर्याराजाला अर्पण करण्याचा मान यंदा निशिगंधा (नीशा) व ओंकार प्रमोद कोळी या नवविवाहित जोडप्याला देण्यात आला होता. कोपरी येथील आनंदनगर भागातील गांधीनगरमधील आगरी-कोळी-बांधवांनीही पारंपरिक नृत्य सादर करून उत्साहाने वाजतगाजत गाºहाणे घालून दर्याराजाने आतातरी शांत व्हावे, अशी आर्त हाक दिली.कल्याणमध्ये मिरवणुकीचा जल्लोषकल्याण : आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे शुक्रवारी नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात लाल टोप्या घालून सहभागी झालेल्या आगरी कोळीबांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली.बैलगाडीवर सोनेरी नारळ सजवून ठेवला होता. प्रारंभी युवा गर्जना ढोलताशा पथकाने गजर करत जोरदार सलामी दिली. बैलांसह सजवलेल्या गाड्यांवर लहान मुले बसली होती. ‘सन आयलाय गो नारळी पुनवेचा’ या गाण्यावर आगरी कोळीबांधवांनी नृत्याचा ठेका धरला होता.

मिरवणुकीत खा. कपिल पाटील, आ. नरेंद्र पवार, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, सुनील वायले, जयवंत भोईर, दीपक भोईर, विनोद डोणे, दया गायकवाड, शक्तिवान भोईर आदी सहभागी झाले. शिवाजी चौकातून काढलेल्या या मिरवणुकीची सांगता दुर्गाडी खाडीजवळ झाली. यावेळी सोनेरी नारळ अर्पण केला.

टॅग्स :thaneठाणेRakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधन