शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

धसईमधील कॅशलेस यंत्रणा गुंडाळली , दुकानदारांकडे स्वाइप मशीन धूळ खात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 00:21 IST

नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला.

- पंकज पाटील, मुरबाडनोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला. शहरापासून लांब असतानाही या गावात कॅशलेस यंत्रणा सुरू करण्याचे धाडस करण्यात आले. या गावातील सर्व व्यापाऱ्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्नही केले. मुख्य बाजारपेठेतील ७४ हून अधिक व्यापाऱ्यांनी स्वाइप मशीन विकत घेतल्या. मात्र, धसई आणि परिसरातील गावांमध्ये डेबिटकार्ड वापरणाºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे व्यापारी सकारात्मक असले तरी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. कॅशलेस मोहिमेकडे विशिष्ट काळातच लक्ष देण्यात आले. आता दुकानदारांच्या स्वाइप मशीन धूळखात आहेत. अनेकांनी मशीन बँकेला परत केल्या आहेत. आज या भागात आठ ते दहा दुकानांतच मशीन असून उर्वरित दुकानदार हे रोखीने व्यवहार करत आहेत. त्यामुळे धसईची कॅसलेस गावाची संकल्पना आणि ओळख संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले धसई हे निसर्गरम्य गाव. धसई या गावाची खरी ओळख म्हणजे माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांची कर्मभूमी. डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसल्याने या ठिकाणी निम्मी लोकवस्ती ही आदिवासीबांधवांची आहे.धसई परिसरात ३५ ते ४० लहानमोठे आदिवासीपाडे आणि गावे आहेत. या सर्व गावांची मुख्य बाजारपेठ ही धसई गावातच भरते. धसई गावातील बाजारपेठेवरच सर्व गावांचा व्यवहार अवलंबून असल्याने या ठिकाणी अनेक व्यापारी स्थिरावले आहेत. दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तूंची गरज भासते, त्या सर्व वस्तूंची बाजारपेठ या ठिकाणी उभी करण्यात आली आहे.मात्र, केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालताच देशातील सर्व बाजारपेठांप्रमाणे या धसई गावातील बाजारपेठही ठप्प झाली होती. व्यवहारासाठी लागणारे चलन उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणी व्यापाºयांना आपला व्यवसाय तोट्यात चालवावा लागत होता. तर, काही व्यापाºयांनी उधारीवर सामान देऊन व्यवसायाचा गाडा पुढे ढकलत नेला होता.गावात मोजक्या दोन बँका असल्याने त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत होती. रोख हातात कमी प्रमाणात येत असल्याने या बाजारपेठेला उतरती कळा लागली होती. धसई गावातील या परिस्थितीवर मात करायची कशी, यावर चर्चा सुरू असताना येथील ग्रामस्थांनी एक अनोखा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला.गावातील सर्व व्यापार तोट्यात असल्याने त्यातून सावरण्यासाठी रोखमुक्त गाव करता येईल का, यावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी खरी साथ दिली, ती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी. मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये संचालक म्हणून सावकरक काम करत आहेत.सावरकर यांनी ‘रोखमुक्त गाव’ निर्माण करण्याचा संकल्प पुढे केला. त्यासाठी धसईची निवड केली. धसई हे गाव आदिवासी भागात मोडत असल्याने या ठिकाणी ही संकल्पना यशस्वी केल्यास देशात कुठेही ही संकल्पना राबवता येणे शक्य आहे, हाच हेतू ठेवण्यात आला. या मोहिमेसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले.कॅशलेससाठी प्रत्येक दुकानदारांना कार्ड स्वाइप मशीनची गरज होती. या मोहिमेसाठी बँक आॅफ बडोदा यांनी व्यापाºयांकडून दोन हजार रुपये अनामत रक्कम घेऊन ७४ दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. दुकानदारांनी हे यंत्रही घेतले. मात्र, तीन ते चार महिन्यांनंतर या यंत्राचा वापर कमी झाला.बँकेने स्वाइप मशीनसाठी वर्षभर कोणतीही फी आकारली नाही. तोपर्यंत दुकानदारांनी हे यंत्र आपल्या दुकानात ठेवले. मात्र, दुकानातील मशीनवर कार्ड स्वाईप करणारे ग्राहकच येत नसल्याने हे यंत्र धूळखात होते. वर्ष उलटल्यानंतर या यंत्रावर महिन्याला ५०० ते ७०० रुपये शुल्क आकारण्यास बँकेने सुरुवात केली.ग्राहक येतच नसतील तर यंत्रासाठी महिन्याला एवढी रक्कम भरावीच का, हा प्रश्न व्यापाºयांना पडला. राहिलेल्या यंत्रासाठी महिन्याला पैसे भरावे लागत असल्याने ६० हून अधिक दुकानदारांनी ही यंत्रे बँकेला परत केले. त्यामुळे आजच्याघडीला धसईमध्ये ८ केवळ ते १० यंत्र उपलब्ध आहेत.अनेकवेळा नेटवर्क नसल्याने कार्डद्वारे व्यवहार करणे अवघड जाते. मोजकेच ग्राहक डेबिटकार्डचा वापर करत असल्याने या भागात अपेक्षित असलेली कॅशलेसची मोहीम मंदावली. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, कॅशलेस यंत्रणा आहे असे म्हणणेही चुकीचे ठरेल.नोटबंदीनंतर धसईला रोखमुक्त गावाचे बिरूद काही दिवसच मिरवता आले. नवलाईचे नऊ दिवस संपले आणि हळुहळु येथील व्यवहार पूर्वीप्रमाणेच रोखीने व्हायला सुरूवात झाली.

टॅग्स :thaneठाणे