शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

उत्तनच्या मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 8:03 PM

उत्तनच्या चौक येथील नाखवा डेनिस फ्रान्सिस मुनिस हे आपली 'अब्राहम' हि मासेमारी बोट घेऊन २८ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेले होते

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथून मासेमारीसाठी गेलेल्या अब्राहम बोटीला भर समुद्रात राजकोटहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका  मालवाहू जहाजाने धडक दिली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी बोटीचे नुकसान झाले आहे . 

 

उत्तनच्या चौक येथील नाखवा डेनिस फ्रान्सिस मुनिस हे आपली 'अब्राहम' हि मासेमारी बोट घेऊन २८ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेले होते . ३० ऑगस्ट रोजी ८० किलोमीटर खोल समुद्रात मासेमारी साठी कवीला बोट बांधून रात्रीचे जेवण आटोपून झोपून गेले . तर दोघे जण बोटीवर जागे होते . मध्यरात्रीच्या वेळी राजकोट वरून मुंबईच्या दिशेने जाणारे एक मालवाहू जहाज बोटीच्या दिशेने वेगात येताना त्या मच्छीमारांना दिसले . 

 

त्यांनी प्रसंगावधान राखून कवीला बांधलेला बोटीचा दोरखंड कापुन बोट बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत त्या जहाजाने बोटीच्या पुढील भागाला जबर धडक दिली. त्यात बोटीच्या नाळीला मोठी भेग पडली. बोट वेळीच बाजूला घेतली म्हणून मोठा अनर्थ टळला. 

 

सदर बोट चौक धक्क्यावर आणण्यात आली असून बोटीच्या नाळीसह कवीचे सुमारे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे . बोटीच्या दुरुस्ती कामा मुळे मासेमारीच्या हंगामास मुकावे लागणार असल्याचे नाखवा डेनिस यांनी सांगितले . याप्रकरणी डोंगरी - चौक मच्छिमार संस्थेने उत्तन सागरी पोलीस ठाण्यासह मुंबईच्या येलो गेट पोलीस ठाणे, राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त, तटरक्षक दल आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे त्या मालवाहू जहाजाविरोधात तक्रार केली असून नुकसान भरपाई आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली असल्याचे विल्यम गोविंद यांनी सांगितले .