शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"गावठाण, कोळीवाड्यांची सुनावणी रद्द करा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:12 AM

ठाणे शहर गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

ठाणे : ठाण्यात राबविण्यात येत असलेली क्लस्टर योजना अद्यापही सुरू झालेली नाही. तीमधून गावठाणे-कोळीवाडे वगळले आहेत किंवा नाही, याबाबत अद्यापही अध्यादेश काढलेला नाही. यामुळे या योजनेच्या विशेष नियमावलीअंतर्गत नागरी पुनर्निर्माण आराखडा (यूआरपी) याबाबत सूचना/ हरकतींवर होणारी कोळीवाडा, गावठाण, पाडे येथील भूमिपुत्रांसह सर्व ठाणेकरांची सुनावणी रद्द करावी. तसेच जर गावठाण, कोळीवाडे, पाडे वगळले असतील, तर तसा शासन निर्णय आदेश तत्काळ काढावा, अशी मागणी ठाणे शहर गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.या मागणीसाठी येथील भूमिपुत्रांनी मागील दीड वर्षापासून लढा उभारला असून त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळण्यात येतील, असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, आजपर्यंत त्याचे शासन निर्णय आदेशामध्ये रूपांतर झाले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. तसेच विधानसभा व विधान परिषद सभागृहांत जोपर्यंत गावठाण, कोळीवाडे यांचे विस्तारित सीमांकन होत नाही, तोपर्यंत क्लस्टर योजना तशाच विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही योजना राबवता येऊ नयेत व येणारदेखील नाहीत, त्याबाबत सखोल चर्चा होऊन आश्वासनही देण्यात आले आहे. परंतु, तरीदेखील क्लस्टर योजना जोरजबरदस्तीने रेटण्याचा अट्टहास का, असा सवाल समितीने केला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून आता आपण गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळले, असा शासन निर्णय लवकर काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.शिवाय, ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव प्र.क्र. ५८६ मध्ये गावठाण, कोळीवाडे वगळण्याचे प्रस्तावित केले आहे. असे असतानाही संबंधित अधिकारी गावठाण, कोळीवाडा येथील स्थानिक भूमिपुत्रांना क्लस्टर योजनेबाबत सुनावणीसाठी का बोलावत आहेत, याचा जाब विचारून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.