शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

टिटवाळयातील खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 16:36 IST

नागरिकांतून प्रशासनाविरुध्द निघतो नाराजीचा सूर, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.  

उमेश जाधव

टिटवाळा :  खड्डेमय रस्ते हे अनेकवेळा अपघातास कारणीभूत ठरून अनेकजणांच्या मृत्युचेही कारण ठरले आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार टिटवाळा शहरात घडताना दिसत आहेत. गेली पंधरा दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा पूर्वेकडील रस्त्यांची सध्या स्थितीला झालेली दयनिय अवस्था झाली आहे. यामुळे हे खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र टिटवाळा शहरासह बल्याणी- शहाड या रस्त्यावर पहावयास मिळते.

टिटवाळा पूर्वेकडील रहदारीचे मुख्य रस्ते सध्या दयनीय अवस्थेत असून ठिक ठिकाणी रखडलेले व खडेमय रस्ते येथून रहदारी करताना वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. निमकर नाका ते सावरकर नगर या रस्त्यावर निमकर नाका ते नाईक ऑटो पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र येथे दिसून येते. अशीच अवस्था मातादी मंदीर ते कल्याण-आंबिवली-शहाड या रस्त्याची झाली आहे. तसेच हरी ओम व्हॅली ते गणेश नगर डिजी वन समोरील रस्ता, नांदप रोड इंदीरा नगर, स्मशान भूमी रोड, मांडा सांगोडा रोड या रस्त्यांचा अक्षरशः चाळण झाली आहे. वाहना चालकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. या खड्डयांत दुचाकी आदळून अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. तसेच या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी नागरिक पायी प्रवास करत असतात वाहने खड्ड्यात आदळली की त्यातील पाणी त्यांच्या अंगावर उडण्याच्या घटना देखील घडत आहेत. 

२०१४ सालापासून सुरु असलेल्या निमकर नाका ते सावरकर नगर ह्या रस्त्याचे घोडे अजून किती दिवस अडून राहणार आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा याबाबत पत्रव्यवहार करूनही निष्क्रिय प्रशासकीय व्यवस्थेमुळे परिस्थिती तशीच आहे. यामुळे  येथील वाहनचालक आणि नागरिकाना या रस्त्यांवरून रहदारी करताना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच हे प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सूर  नागरिकांतून  निघत आहे.

२०१४ साली सदर रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. निमकर नाका ते सावरकर चौक ते नांदू रोड या रसत्यासाठी 5 कोटीच्या जास्त निधी मंजूर झाला आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत केव्हाच संपली असून देखील दोन्ही रस्तांची कामे सध्या अपूर्ण अवस्थेत दिसून येत आहे. चार वर्षं इतका प्रदीर्घ काळावधी संपून देखील रस्ते पूर्ण होत नाहीत. या अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जाणून बुडून पालिका प्रशासनाकडून टिटवाळा करांना त्रास देण्याचा प्रताप सुरू असल्याचा सुर येथून निघत आहे. पालिका प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkalyanकल्याणPotholeखड्डे