शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळयातील खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 16:36 IST

नागरिकांतून प्रशासनाविरुध्द निघतो नाराजीचा सूर, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.  

उमेश जाधव

टिटवाळा :  खड्डेमय रस्ते हे अनेकवेळा अपघातास कारणीभूत ठरून अनेकजणांच्या मृत्युचेही कारण ठरले आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार टिटवाळा शहरात घडताना दिसत आहेत. गेली पंधरा दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा पूर्वेकडील रस्त्यांची सध्या स्थितीला झालेली दयनिय अवस्था झाली आहे. यामुळे हे खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र टिटवाळा शहरासह बल्याणी- शहाड या रस्त्यावर पहावयास मिळते.

टिटवाळा पूर्वेकडील रहदारीचे मुख्य रस्ते सध्या दयनीय अवस्थेत असून ठिक ठिकाणी रखडलेले व खडेमय रस्ते येथून रहदारी करताना वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. निमकर नाका ते सावरकर नगर या रस्त्यावर निमकर नाका ते नाईक ऑटो पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र येथे दिसून येते. अशीच अवस्था मातादी मंदीर ते कल्याण-आंबिवली-शहाड या रस्त्याची झाली आहे. तसेच हरी ओम व्हॅली ते गणेश नगर डिजी वन समोरील रस्ता, नांदप रोड इंदीरा नगर, स्मशान भूमी रोड, मांडा सांगोडा रोड या रस्त्यांचा अक्षरशः चाळण झाली आहे. वाहना चालकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. या खड्डयांत दुचाकी आदळून अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. तसेच या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी नागरिक पायी प्रवास करत असतात वाहने खड्ड्यात आदळली की त्यातील पाणी त्यांच्या अंगावर उडण्याच्या घटना देखील घडत आहेत. 

२०१४ सालापासून सुरु असलेल्या निमकर नाका ते सावरकर नगर ह्या रस्त्याचे घोडे अजून किती दिवस अडून राहणार आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा याबाबत पत्रव्यवहार करूनही निष्क्रिय प्रशासकीय व्यवस्थेमुळे परिस्थिती तशीच आहे. यामुळे  येथील वाहनचालक आणि नागरिकाना या रस्त्यांवरून रहदारी करताना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच हे प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सूर  नागरिकांतून  निघत आहे.

२०१४ साली सदर रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. निमकर नाका ते सावरकर चौक ते नांदू रोड या रसत्यासाठी 5 कोटीच्या जास्त निधी मंजूर झाला आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत केव्हाच संपली असून देखील दोन्ही रस्तांची कामे सध्या अपूर्ण अवस्थेत दिसून येत आहे. चार वर्षं इतका प्रदीर्घ काळावधी संपून देखील रस्ते पूर्ण होत नाहीत. या अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जाणून बुडून पालिका प्रशासनाकडून टिटवाळा करांना त्रास देण्याचा प्रताप सुरू असल्याचा सुर येथून निघत आहे. पालिका प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkalyanकल्याणPotholeखड्डे