शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दफनविधी साहित्याचे दर समाजमाध्यमावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:51 IST

मृतांच्या नातेवाइकांची होतेय लूट; विक्रेत्याने लढविली शक्कल

- कुमार बडदे मुंब्रा : मृतदेह दफन करण्यासाठी, तसेच अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या मृताच्या आप्तस्वकीयांची विक्रेत्यांकडून अनेकदा लूट होते. ती थांबावी, यासाठी एका विक्रेत्याने दफनविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर चक्क समाजमाध्यमावर व्हायरल केल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.मृत व्यक्तीच्या अंतिम विधी (मृतदेह दफन करणे किंवा अंत्यसंस्कार करणे) साठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करताना मृताचे आप्तस्वकीय तसेच मित्रपरिवाराची धावपळ होते. घरातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असताना, दु:ख बाजुला सारुन नातलगांना अंत्यविधीच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी पायपीट करावी लागते. हे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेली व्यक्ती त्यावेळी दराच्या बाबतीत घासाघीस करण्याच्या मन:स्थितीमध्ये नसते. नेमक्या याच संधीचा लाभ घेवून, अंत्यविधीच्या साहित्याची विक्री करणारे काही विक्रेते अवाजवी दर आकारुन लोकांची लूट करतात. विक्रेत्यांकडून पैसे तर जास्त घेतलेच जातात, शिवाय त्यामोबदल्यात साहित्यही चांगल्या दर्जाचे दिले जात नाही. बरेचदा खराब झालेल्या साहित्याची विक्री करताना हे विक्रेते दिसून येतात. अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मुंब्रा येथील सरफराज दरबारी यांनी शक्कल लढवली. त्यांनी दफनविधी व अंत्यसंस्कारासाठी लागणाºया साहित्य विक्रीचे दर समाजमाध्यमावर व्हायरल केले. सोशल मीडियावर बहुतेक जण सक्रिय असतात. त्यांच्यापर्यंत अंत्यविधीच्या साहित्याचे योग्य दर पोहोचावेत, त्यांची लूट थांबावी, हा उद्देश असल्याचे सरफराज दरबारी यांनी लोकमतला सांगितले.सरफराज यांनी व्हायरल केलेल्या पोस्टनुसार अत्यंत नाममात्र दरात दफनविधीसाठी लागणाºया तीन चटया, गुलाबपाणी, १८ मीटर कापड, कापूस, मृतदेहाला अंघोळ घालण्यासाठी साबण, सुईधागा, अत्तर आदी साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्रा व परिसरात दफनविधीचे साहित्य विकणाºया काही दुकानांत अवाच्या सव्वा दराने या साहित्याची विक्री होत असल्याने गोरगरीब मुस्लिम कुटुंबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया