शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये रंगणार बौद्ध साहित्य संमेलन

By admin | Updated: November 8, 2016 02:12 IST

‘प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी’तर्फे ११ डिसेंबरला एक दिवसाचे बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे.

कल्याण : ‘प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी’तर्फे ११ डिसेंबरला एक दिवसाचे बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. या संमेलनासाठी निधी मिळावा, यासाठी अकादमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. निधी देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन देवळेकर यांनी शिष्टमंडळास दिले आहे.बौद्ध साहित्य संमेलन कल्याण पश्चिमेतील वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या भव्य प्रांगणात भरविले जाणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद सुनील सोनवणे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद व चर्चासत्रे होतील. या संमेलनास डॉ. यशवंत मनोहर, भाऊ लोखंडे, ज. वि. पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचा खर्च १५ लाख रुपये आहे. अकादमीला १५ लाखांचा निधी मिळाल्यास उत्तम. मात्र त्यापैकी काही खर्च म्हणून महापालिकेने अकादमीला संमेलनासाठी निधी द्यावा, अशी मागणी अकादमीचे प्रमुख सुनील सोनवणे, साहित्यिक निरंजन पाटील यांनी केली आहे. यावेळी अकादमीतर्फे चंद्रशेखर भारती, ‘मैत्रेय महिला संस्थे’च्या नंदिनी साळवे आदी उपस्थित होते. संमेलनासाठी स्वनिधीतून १० लाख रुपये उभारण्याचा अकादमीचा मानस आहे. महापालिकेने संमेलनासाठी किमान तीन लाख रुपये निधी द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निधीसाठी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांच्याकडेही अकादमीने मागणी केली आहे. पवार यांनी यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन अकादमीस दिले आहे. तसेच त्यांनी निधीसाठी अकादमीला महापालिकेकडे पाठवले आहे. आमदार निधीतून जास्त निधी संमेलनास देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अकादमीच्या शिष्टमंडळास देवळेकर म्हणाले की, निधी देण्याबाबत मी सकारात्मक आहे. निधी जास्त हवा असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी. त्यांनी आयुक्तांना पत्राद्वारे संमेलनास निधी देण्याचे आदेश दिल्यास आयुक्त संमेलनास तातडीने निधी उपलब्ध करून देतील. संमेलनाच्या आयोजनासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे निधीचा विषय लवकर मार्गी लावावा, याकडे अकादमीचे प्रमुख सोनवणे यांनी लक्ष वेधले आहे.मागील आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो थेरो यांनी सरकार हिंदू धर्माला राजाश्रय देत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बौद्ध धम्माच्या कार्यक्रमास सरकारकडून निधी जाता नाही. त्यानंतर बौद्ध साहित्य संमेलन भरविले जात आहे. त्याला सरकारने निधी देण्याचा विचार न केल्यास बोधीपालो यांचा आरोप खरा असल्याचे पुन्हा सिद्ध होईल. कल्याणमध्ये बौद्ध साहित्य संमेलन तर डोंबिवलीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निधीचाही मुद्दा प्रचंड गाजत आहे. संस्कृती रुजवण्यासाठी साहित्य संमेलने भरविली जातात. संमेलनाच्या विचारधारा वेगळ््या असल्या तरी अभिजन व बहुजन साहित्य संमेलन प्रबोधनासाठी भरविले जाते, असे सांगून ‘प्रज्ञा साहित्य अकादमी’चे सोनवणे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टीका टिप्पणी करण्याचे सोयस्कररित्या टाळले आहे.