शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

कल्याणमध्ये रंगणार बौद्ध साहित्य संमेलन

By admin | Updated: November 8, 2016 02:12 IST

‘प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी’तर्फे ११ डिसेंबरला एक दिवसाचे बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे.

कल्याण : ‘प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी’तर्फे ११ डिसेंबरला एक दिवसाचे बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. या संमेलनासाठी निधी मिळावा, यासाठी अकादमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. निधी देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन देवळेकर यांनी शिष्टमंडळास दिले आहे.बौद्ध साहित्य संमेलन कल्याण पश्चिमेतील वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या भव्य प्रांगणात भरविले जाणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद सुनील सोनवणे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद व चर्चासत्रे होतील. या संमेलनास डॉ. यशवंत मनोहर, भाऊ लोखंडे, ज. वि. पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचा खर्च १५ लाख रुपये आहे. अकादमीला १५ लाखांचा निधी मिळाल्यास उत्तम. मात्र त्यापैकी काही खर्च म्हणून महापालिकेने अकादमीला संमेलनासाठी निधी द्यावा, अशी मागणी अकादमीचे प्रमुख सुनील सोनवणे, साहित्यिक निरंजन पाटील यांनी केली आहे. यावेळी अकादमीतर्फे चंद्रशेखर भारती, ‘मैत्रेय महिला संस्थे’च्या नंदिनी साळवे आदी उपस्थित होते. संमेलनासाठी स्वनिधीतून १० लाख रुपये उभारण्याचा अकादमीचा मानस आहे. महापालिकेने संमेलनासाठी किमान तीन लाख रुपये निधी द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निधीसाठी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांच्याकडेही अकादमीने मागणी केली आहे. पवार यांनी यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन अकादमीस दिले आहे. तसेच त्यांनी निधीसाठी अकादमीला महापालिकेकडे पाठवले आहे. आमदार निधीतून जास्त निधी संमेलनास देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अकादमीच्या शिष्टमंडळास देवळेकर म्हणाले की, निधी देण्याबाबत मी सकारात्मक आहे. निधी जास्त हवा असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी. त्यांनी आयुक्तांना पत्राद्वारे संमेलनास निधी देण्याचे आदेश दिल्यास आयुक्त संमेलनास तातडीने निधी उपलब्ध करून देतील. संमेलनाच्या आयोजनासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे निधीचा विषय लवकर मार्गी लावावा, याकडे अकादमीचे प्रमुख सोनवणे यांनी लक्ष वेधले आहे.मागील आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो थेरो यांनी सरकार हिंदू धर्माला राजाश्रय देत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बौद्ध धम्माच्या कार्यक्रमास सरकारकडून निधी जाता नाही. त्यानंतर बौद्ध साहित्य संमेलन भरविले जात आहे. त्याला सरकारने निधी देण्याचा विचार न केल्यास बोधीपालो यांचा आरोप खरा असल्याचे पुन्हा सिद्ध होईल. कल्याणमध्ये बौद्ध साहित्य संमेलन तर डोंबिवलीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निधीचाही मुद्दा प्रचंड गाजत आहे. संस्कृती रुजवण्यासाठी साहित्य संमेलने भरविली जातात. संमेलनाच्या विचारधारा वेगळ््या असल्या तरी अभिजन व बहुजन साहित्य संमेलन प्रबोधनासाठी भरविले जाते, असे सांगून ‘प्रज्ञा साहित्य अकादमी’चे सोनवणे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टीका टिप्पणी करण्याचे सोयस्कररित्या टाळले आहे.