शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

रायतेजवळ उल्हास नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक अद्याप ठप्पच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:11 IST

तत कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला होता. यात कल्याण तालुक्यातील रायते जवळ असणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता.

- उमेश जाधव टिटवाळा -  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला होता. यात कल्याण तालुक्यातील रायते जवळ असणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. पाणी ओसरल्यानंतर पुला लगतच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला असल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू. दोन दिवसापासून कल्याण तालुक्याला पावसाने झोडपून काढल्यामुळे येथील काळू, भातसा व उल्हास या तिन्ही नद्यांना महापूर आल्याने तिन्ही नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले होते. उल्हास नदीवरील पुराचे पाणी ओसरल्यावर पुलाला जोडा असणारा रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याची बाब निदर्शनास आली. 26 जुलै रोजी झालेल्या पुरात देखील हाच भाग वाहून गेला होता. 27 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे मुरबाड येथील दौऱ्यावर येणार असल्या कारणास्तव हा भाग त्यावेळेस तात्काळ दुरुस्त करण्यात आला होता. शनिवारी व रविवारी झालेल्या पुरात सदर रस्ता पुन्हा एकदा वाहून गेल्याने या कल्याण मुरबाड नगर मार्गावरील दोन दिवसापासून आजपर्यंत ठप्प आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा रांगा लागल्या आहेत. सध्या या वाहून गेलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. लवकरच हा रस्त्याचा भाग दुरुस्त केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस