शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने केली आत्महत्या; वर्धा येथील मुलीची अंबरनाथमध्ये हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 18:11 IST

वर्धा जिल्ह्यातील इंजिनियर असलेल्या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या करुन स्वत: देखील आत्महत्या केली आहे. हा प्रकार अंबरनाथ कानसई गांव परिसरात घडला

 अंबरनाथ - वर्धा जिल्ह्यातील इंजिनियर असलेल्या तरुणीची तीच्याच प्रियकराने हत्या करुन स्वत: देखील आत्महत्या केली आहे. हा प्रकार अंबरनाथ कानसई गांव परिसरात घडला असून, या मुलीची हत्या दोन ते तीन दिवस आधीच केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हत्येनंतर प्रियकराने मुलीच्या नातेवाईकांना फोन करुन या घटनेची कल्पना दिल्यावर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरणी समोर आले आहे. 

वर्धा जिल्ह्यातील पिपरी मेघे येथे राहणारी तरुणी आचल महल्ले ही ठाण्यातील एका खाजगी कंपनीत इंजिनियर म्हणून कामाला होती. कामासाठी ठाण्यात आलेल्या आचल या तरुणीने दिव्यात भाडेतत्वावर एक घर घेतले. आचल आपल्या आई आणि भावासह दिव्यात राहत होती. तिचे कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेल्याने आचल दिव्यातील घरात एकटीच होती. याच दरम्यान दिचा प्रियकर नत्रम वर्मा हा अंबरनाथमध्ये कानसई गावात एक खोली भाडेतत्वावर घेऊन राहत होता. हे घर भडेतत्वावर घेतांना नेत्रमने ही मुलगी आपली प}ी असल्याचे भासविले होते. गेल्या महिन्याभरापासुन आचल हीचा वावर या घरात सुरु होता. आचलची आई गावी गेल्यावर आचलने दिव्यातील आपल्या शेजा-यांना रुग्णालयात जात असल्याचे सांगुन घराबाहेर पडली. मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. आचल ही प्रियकर नत्रम याच्यासोबत अंबरनाथच्या घरात होती. यावेळी नेत्रम याने तीचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर दोन दिवस त्याने तीला त्याचा घरात ठेवले. अखेर मृतदेहातुन दरुगधी पसरू लागल्यावर नेत्रम याने आचलच्या मोबाईलवरुन तीच्या मावशीचा नंबर काढुन त्यावर तीच्या मावशीला फोन केला. आचल ही आता या जगात राहिली नाही. तीची हत्या मी केली आहे. तीच्यासोबत मी देखील जात आहे असे सांगुन त्याने फोन कापला. तसेच त्याच नंबरवर त्याने तीच्या मावशीला मेसेज पाठवित अंबरनाथच्या घरचा पत्ता देखील पाठविला. मावशीला हा निरोप मिळताच आचलच्या नातेवाईकांनी दिव्यातील गाजेखान पठाण याला संपर्क साधत आचलचा शोध घेण्यास सांगितले. 24 ऑक्टोंबरला सकाळी पठाण यांनी कानसई गावात तो पत्ता शोधला. त्यानंतर पोलीसांच्या मदतीने घर उघडल्यावर आचल हीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तर नत्रमचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. 

 

* नेत्रम हा आचलच्या मागे लागुन तीला त्रस देत असल्याची तक्रार वर्धा जिल्ह्यात तीच्या पालकांनी दाखल केला होता. नेत्रम हा दोन ते तीन वर्षापासुन तीच्या मागे लागला होता असे तक्रारीत नमुद केले होते. 

* नेत्रम याने आचलची हत्या का केली हा तपासाचा भाग असुन पोलीस या प्रकरणात मित्र परिवारांकडे चौकशी करित आहे. या दोघांमध्ये नेमके काय झाले याचा शोध घेणो पोलीसांना आव्हाणात्मक ठरत आहे. 

*नेत्रम आणि आचल यांच्या प्रेमाला आचलच्या घरच्यांचा विरोध असल्याची दाट शक्यता आहे. तसेच नेत्रम हा अंबरनाथमध्ये राहण्यासाठी आल्याची खबर आचलच्या कुटुंबियांना नव्हती असे स्पष्ट दिसत आहे. 

* नेत्रम आणि आचल हे वर्धाचेच रहिवासी असुन त्यांची जुनी ओळख आहे. त्यातुनच त्यांचे प्रेमसंबंधी निर्माण झाले होते.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून