शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भिवंडी महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेचे बोंबा मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:49 IST

तत्कालीन आयुक्तांकडे कामगारांचे विविध प्रश्न, समस्या मांडल्या आहेत. पण, आजपर्यंत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

भिवंडी : महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून अन्याय होत असून त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकवेळ आंदोलन करूनही दाद न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेचे भिवंडी शहराध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयात समोर बुधवारी कामगारांनी बोंब मारो आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी संतोष साळवी यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत बोलताना सांगितले की, तत्कालीन आयुक्तांकडे कामगारांचे विविध प्रश्न, समस्या मांडल्या आहेत. पण, आजपर्यंत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

सातवा वेतन आयोगाचा फरक जानेवारी २०१६ पासून मिळावा, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजने मध्ये १ एप्रिल २०१९ पासून महापालिकेचा वाढीव चार टक्के हिस्सा तात्काळ कामगारांच्या अंशदान निवृत्ती वेतनात वर्ग करावा,नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे तात्काळ खाते उघडून कामगारांना पासबुक उपलब्ध करून द्यावे,नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन अंतर्गत किती कर्मचारी यांची एलआयसी सुरू आहे व किती कर्मचाऱ्यांची एलआयसी बंद झाली आहे. त्याची यादी तात्काळ कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी, मनपा प्रशासनाच्या चुकीमुळे बंद पडलेली एलआयसी पॉलिसीचा दंड, व्याज महानगरपालिकेने स्वतः भरून कामगारांची पॉलिसी पूर्णपणे सुरू करावी, सर्व एलआयसी धारक कामगारांना तात्काळ एलआयसीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व सफाई कामगारांना चांगल्या दर्जाचे गमबूट व रेनकोट उपलब्ध करून द्यावेत या व इतर मागण्यांसंदर्भातील निवेदन देऊन त्यावर चर्चा करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. मनसेच्या या बोंबा मारो आंदोलनाप्रसंगी मनसेचे मदन अण्णा पाटील, बालाजी गुळवी, शैलेश करले,सचिन पाटील,श्याम गायकवाड,सुधीर भोईर, रवी गायकवाड या शिष्टमंडळाने उपायुक्त दीपक पुजारी यांच्या सोबत चर्चा केली असता सर्व मागण्यांवर प्रशासनाकडून झालेल्या कारवाईबाबत येत्या सात दिवसात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिल्याची माहिती संतोष साळवी यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिकाagitationआंदोलन