शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

फलक लागले पण दिशा भरकटलेलीच, नियमांच्या अंमलबजावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:06 AM

ठाकुर्लीतील पुलावर सोमवारी घडलेल्या अपघातानंतर जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मार्गदर्शक फलक तेथे लावले आहेत.

डोंबिवली : ठाकुर्लीतील पुलावर सोमवारी घडलेल्या अपघातानंतर जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मार्गदर्शक फलक तेथे लावले आहेत. परंतु पुलाच्या परिसरातील रस्त्यांवर फलक अद्याप न लावल्याने तेथे वाहतुककोंडीला चालकांना सामोरे जावे लागत आहे.उड्डाणपूल चढत असताना थ्री व्हीलर टेम्पो कठड्याला धडकल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात कठडा तुटून टेम्पो खाली रूळांवर कोसळला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे उशिरा का होईना जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने पुलावर वाहनचालकांसाठी मार्गदर्शक फलक लावले आहेत. ‘कृपया वाहने सावकाश चालवा,’ ‘वेग ताशी ३० कि. मी. ठेवा,’ ‘उड्डाणपुलावर ओव्हरटेक करू नका’ असे फलक लावले आहेत. परंतु, पुलाच्या परिसरातील काही मार्ग एकदिशा केले आहेत. तसेच काहीठिकाणी वाहने उभी करण्यासाठी ‘पी १’ आणि ‘पी २’ असे बदल सूचविले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कानविंदे चौक, व्ही. पी. रोड, मंजूनाथ चौक, गुरूमंदिर रोड, छेडा रोड, छत्रपती संभाजी महाराज पथ या भागांमध्ये हे बदल सूचविण्यात आले आहेत. याबाबतचे दिशादर्शक फलक मात्र अद्यापपर्यंत लावलेले नाहीत. त्यामुळे सध्या येथे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे सकाळ-सायंकाळ पाहावयास मिळत आहे. या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. परंतु, बिनदिक्कतपणे या वाहनांची येजा सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.>मोठ्या अपघातानंतर जाग?टेम्पोच्या अपघातानंतरही वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग येणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुलाच्या परिसरातील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डन नेमण्याची मागणी होत आहे.