शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘विनाअनुदानित’चा ‘काळा दिवस’, इंग्रजी शाळा चालवायच्या कशा? : ‘पुष्मा’चा सवाल; ‘राइट टू एज्युकेशन’मुळे कोंडी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:15 AM

राइट टू एज्युकेशन कायद्यानुसार अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव आहे. या गटातील विद्यार्थ्यांची १७ हजार रुपयांची फी सरकारकडून भरली जाते.

कल्याण : राइट टू एज्युकेशन कायद्यानुसार अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव आहे. या गटातील विद्यार्थ्यांची १७ हजार रुपयांची फी सरकारकडून भरली जाते. मात्र, अनेक शाळांना मागील पाच वर्षांत केवळ दोनच वर्षांची फी मिळाली आहे. त्यातही केवळ ६० टक्केच फीची रक्कम मिळाल्याने खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची कोंडी झाली आहे. याचा सरकारने विचार करावा, असा मुद्दा प्रायव्हेट अनएडेड स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने (पुष्मा) उपस्थित केला आहे.सरकारच्या अन्यायकारक शैक्षणिक धोरणाविरोधात गुरुवारी काळ्या फिती बांधून दिवस पाळण्यात आला. त्यात ठाणे जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सहभाग घेतला. नॅशनल इंडिपेंडंट स्कूल अलायन्सचे संस्थापकीय सदस्य व ‘पुष्मा’चे माजी अध्यक्ष भरत मलिक यांनी सांगितले की, खाजगी कायम विनाअनुदानित इंग्रजी शाळांच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. सरकारचे शैक्षणिक धोरण स्थिर नाही. दर दोन आठवड्यांनी नवा अध्यादेश काढला जातो. इंग्रजी शाळांना किचकट सरल प्रणाली सक्तीची करू नये. शाळांसाठी सुरक्षेचा कायदा करावा. शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून जाचक त्रास दिला जातो. स्कूल बसच्या विम्याच्या रकमेत १०० टक्के वाढ केली आहे. वैयक्तिक गुन्ह्यासाठी संचालक व प्राचार्यांना दोषी धरले जाते, आदी विविध मुद्द्यांचा या वेळी निषेध करण्यात आला.राइट टू एज्युकेशनच्या कायद्यान्वये सरकारकडून मिळणारी फी मागील दोन वर्षांत ४० टक्के आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांवर त्याचा बोजा पडू शकतो. एक शाळेला चालवण्यासाठी वर्षाला किमान २ कोटी रुपये खर्च येतो. पण, फीची ६० टक्के रक्कम मिळत असल्याने वर्षाला किमान ४० लाखांचा खड्डा पडतो. तर, तीन वर्षांची रक्कम साधारणत: १ कोटी २० लाख रुपये कमी येतात. सरकारकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून ही फीची रक्कम दिली जात नाही. सरकारचा प्राधान्यक्रम ठरलेला नाही. सरकारचे शैक्षणिक धोरण ठरलेले नाही. त्याचा फटका इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बसला आहे.मनूभाई ठक्कर म्हणाले, सध्या अनुदानित शाळा बंद पडत आहेत. या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक सरकार इंग्रजी शाळांमध्ये पाठवते. इंग्रजी शाळेत अनुदानित शाळेतील अन्य भाषिक शाळांतील शिक्षक कसा चालेल, तो काय शिकवणार, असे प्रश्न आहेत. १९८७ मध्ये सरकारने जाहीर केले की, इंग्रजी शाळेला अनुदान दिले जाणार नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळा फी वरच चालतात. त्यांचीही कोंडी होणार असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी व शाळा व्यवस्थापनाने कुठे जायचे, असा सवाल आहे.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकkalyanकल्याण