शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘विनाअनुदानित’चा ‘काळा दिवस’, इंग्रजी शाळा चालवायच्या कशा? : ‘पुष्मा’चा सवाल; ‘राइट टू एज्युकेशन’मुळे कोंडी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:15 IST

राइट टू एज्युकेशन कायद्यानुसार अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव आहे. या गटातील विद्यार्थ्यांची १७ हजार रुपयांची फी सरकारकडून भरली जाते.

कल्याण : राइट टू एज्युकेशन कायद्यानुसार अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव आहे. या गटातील विद्यार्थ्यांची १७ हजार रुपयांची फी सरकारकडून भरली जाते. मात्र, अनेक शाळांना मागील पाच वर्षांत केवळ दोनच वर्षांची फी मिळाली आहे. त्यातही केवळ ६० टक्केच फीची रक्कम मिळाल्याने खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची कोंडी झाली आहे. याचा सरकारने विचार करावा, असा मुद्दा प्रायव्हेट अनएडेड स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने (पुष्मा) उपस्थित केला आहे.सरकारच्या अन्यायकारक शैक्षणिक धोरणाविरोधात गुरुवारी काळ्या फिती बांधून दिवस पाळण्यात आला. त्यात ठाणे जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सहभाग घेतला. नॅशनल इंडिपेंडंट स्कूल अलायन्सचे संस्थापकीय सदस्य व ‘पुष्मा’चे माजी अध्यक्ष भरत मलिक यांनी सांगितले की, खाजगी कायम विनाअनुदानित इंग्रजी शाळांच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. सरकारचे शैक्षणिक धोरण स्थिर नाही. दर दोन आठवड्यांनी नवा अध्यादेश काढला जातो. इंग्रजी शाळांना किचकट सरल प्रणाली सक्तीची करू नये. शाळांसाठी सुरक्षेचा कायदा करावा. शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून जाचक त्रास दिला जातो. स्कूल बसच्या विम्याच्या रकमेत १०० टक्के वाढ केली आहे. वैयक्तिक गुन्ह्यासाठी संचालक व प्राचार्यांना दोषी धरले जाते, आदी विविध मुद्द्यांचा या वेळी निषेध करण्यात आला.राइट टू एज्युकेशनच्या कायद्यान्वये सरकारकडून मिळणारी फी मागील दोन वर्षांत ४० टक्के आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांवर त्याचा बोजा पडू शकतो. एक शाळेला चालवण्यासाठी वर्षाला किमान २ कोटी रुपये खर्च येतो. पण, फीची ६० टक्के रक्कम मिळत असल्याने वर्षाला किमान ४० लाखांचा खड्डा पडतो. तर, तीन वर्षांची रक्कम साधारणत: १ कोटी २० लाख रुपये कमी येतात. सरकारकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून ही फीची रक्कम दिली जात नाही. सरकारचा प्राधान्यक्रम ठरलेला नाही. सरकारचे शैक्षणिक धोरण ठरलेले नाही. त्याचा फटका इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बसला आहे.मनूभाई ठक्कर म्हणाले, सध्या अनुदानित शाळा बंद पडत आहेत. या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक सरकार इंग्रजी शाळांमध्ये पाठवते. इंग्रजी शाळेत अनुदानित शाळेतील अन्य भाषिक शाळांतील शिक्षक कसा चालेल, तो काय शिकवणार, असे प्रश्न आहेत. १९८७ मध्ये सरकारने जाहीर केले की, इंग्रजी शाळेला अनुदान दिले जाणार नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळा फी वरच चालतात. त्यांचीही कोंडी होणार असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी व शाळा व्यवस्थापनाने कुठे जायचे, असा सवाल आहे.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकkalyanकल्याण