शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शिवसेना-राष्ट्रवादीच्या वाक् युद्धात भाजपाची उडी; मंत्री जितेंद्र आव्हाडांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 17:47 IST

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड यांनी काम करे बंदर और मार खाये मदारी, असे वक्तव्य केले होते.

ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कळवा खारेगाव रेल्वे उड्डाणपुलावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय नाट्य रंगले असतानाच, आता भाजपनेही त्यामध्ये उडी घेतली आहे. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, मार खाये मदारी हे नेमके कोण? याबाबत गृहनिर्माणमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे, असे म्हणून त्यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. यामुळे ऐन थंडीमध्ये ठाण्यात राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड यांनी काम करे बंदर और मार खाये मदारी, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर भाजपचे ॲड. संदीप लेले यांनी बंदर कोणाला म्हणाले? हे आम्हाला चांगलेच समजते. पण मार खाये मदारी म्हणजे नेमके कोण? हे आव्हाड यांनी सांगावे. ते मंत्री आहेत. त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, त्यांनी ठाणे शहराच्या विकासाची कामे करावी, असे म्हणून लेले यांनी आव्हाडांवर निशाणा साधला.

आनंद परांजपेंची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयाची लढाई रविवारीही पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, असा टोला परांजपे यांनी लगावला. तर आपण ठिणगी लावली तर आग लागणारच, आम्ही शिवसैनिक आहोत, असा प्रतिटोला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी परांजपेंना लगावला.

खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर आधी मंत्री आव्हाड आणि नंतर कल्याणचे खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना परांजपे म्हणाले, आपल्या भाषणात स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पालकमंत्र्याचे आदेश धुडकवले आहेत. आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल, मात्र उड्डाणपुलाच्या आमचा पाठपुरावा असल्याचा पुनरुच्चार केला. खासदार शिंदे यांनी श्रेय घ्यावे मात्र, गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादीवर आघात झाला तर आपण प्रतिउत्तर देणारच असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा