शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विरोधी पक्ष नेता पद तांत्रिक अडचणीत टाकण्याची भाजपाची खेळी; सेनेची सरशी होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 19:41 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतापदी सेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालीत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी हे पद तांत्रिक अडचणीचे असुन महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार विरोधी पक्षातील मोठ्या पक्षाचा नेता महापौरांकडून घोषित झाल्यास त्या पदावर त्याच नेत्याची (गटनेता) नियुक्ती करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

- राजू काळे 

भाईंदर :  मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतापदी सेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालीत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी हे पद तांत्रिक अडचणीचे असुन महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार विरोधी पक्षातील मोठ्या पक्षाचा नेता महापौरांकडून घोषित झाल्यास त्या पदावर त्याच नेत्याची (गटनेता) नियुक्ती करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महापौर डिंपल मेहता यांनी देखील त्यावर राज्य सरकारचा अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे सेनेची तांत्रिक कोंडी करण्याची खेळी भाजपाकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

पालिका स्थापनेनंतर पार पडलेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीतील सत्तास्थापनेवेळी विरोधी पक्ष नेता पद तांत्रिक अडचणीतच सापडले आहे. २००२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसचे परशुराम पाटील यांची विरोधी पक्ष नेता पदी निवड करण्यात आली. या पदावर विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाचा दावा असताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची विरोधी पक्ष नेता पदी नियुक्ती केल्याने विरोधी पक्षातील भाजपाचे सदस्य रोहिदास पाटील यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांचा दावा फोल ठरल्याने परशुराम पाटील त्या पदावर कायम राहिले. २००७ मधील निवडणुकीनंतरही सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसचे चंद्रकांत वैती यांची त्या पदावर वर्णी लावण्यात आल्याने त्याविरोधात सुद्धा विरोधकांनी आवाज उठविला. परंतु, त्याचा ठोस पाठपुरावा न झाल्याने वैती हे त्या पदावर कायम राहिले. २०१२ मधील निवडणुकीनंतर सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यावेळी नरेंद्र मेहता यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली. आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर शिवसेना-भाजपा युतीची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी असतानाही महापौर गीता जैन यांनी राष्ट्रवादीने सदस्यांच्या नावाची शिफारस न केल्याचे कारण पुढे करुन काँग्रेसने केलेली शिफारस ग्राह्य धरली. त्यानुसार त्यांनी काँग्रेसचे प्रमोद सामंत यांची विरोधी पक्ष नेता पदी नियुक्ती केली. यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेत त्यावर नियमानुसार पक्षाचा अधिकार असल्याचा दावा करीत लियाकत शेख यांच्या नावाची शिफरास केली. परंतु, महापौरांनी ती अमान्य केल्याने राष्टÑवादीने त्याविरोधात राज्य सरकारकडे तक्रार केली. परंतु, त्याला विलंब होऊ लागल्याने त्यावेळचे राष्ट्रवादी गटनेता बर्नड डिमेलो यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने राष्ट्रवादीचा दावा मान्य केल्याने अवघ्या ६ महिन्यांत सामंत यांना ते पद सोडावे लागले. यानंतरही यंदा त्या पदावरील नियुक्तीचा वाद उफाळुन आला आहे. यंदा विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष शिवसेना असल्याने त्या पदावर याच पक्षाचा अधिकार असला तरी ते पद भाजपाने कायद्यातील शब्दांच्या तांत्रिक अडचणीत अडकवुन शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामुळेच संतप्त सेनेच्या सदस्यांनी ८ नोव्हेंबरच्या महासभेत गोंधळ घातला. यामुळे पुढील महासभेत हा वाद पुन्हा चिघळणार असल्याची चिन्हे असतानाच  महापौर डिंपल मेहता यांच्या पत्रव्यवहारावर लवकरच सरकारी अभिप्राय पालिकेला प्राप्त होणार असल्याचे सुत्राकडुन सांगितले जात आहे. मात्र त्यात सेनेची सरशी होऊन भाजपाची राजकीय खेळी मात्र तोंडघशी पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर