शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभेवर भाजपचा दावा

By अजित मांडके | Updated: April 4, 2024 17:09 IST

ठाणे लोकसभा भाजपलाच का मिळावा त्याची काही महत्वाची कारणे देखील काही पदाधिकाऱ्यांनी पुढे केली आहेत.

ठाणे :ठाणे लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नाही. परंतु हा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याचा दावा शिंदे सेनेकडून केला जात असतांना आता भाजपने आता सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदार संघ हा शत प्रतीशत भाजपाच असल्याचा दावा सुरु केला आहे. त्यात ठाणे लोकसभा भाजपलाच का मिळावा त्याची काही महत्वाची कारणे देखील काही पदाधिकाऱ्यांनी पुढे केली आहेत. त्यामुळे ठाण्याची जागा कोणाला जाणार हे पाहणे आता निश्चितच महत्वाचे ठरणार आहे.

ठाणे आणि कल्याणचे अद्यापही शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यात ठाणे लोकसभा शिवसेनेचाच लढणार असल्याचे शिंदे सेनेकडून ठासून सांगितले जात आहे. परंतु भाजपकडून देखील हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी दबाव वाढविला जात आहे. ठाण्यातील भाजपच्या स्थानिक मंडळींनी ठाण्यावर यापूर्वी देखील भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगितले आहे. भाजपला एक परांपरा आहे, परंतु मधल्या काळात युतीचा धर्म पाळतांना हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. परंतु आता भाजपची ताकद केवळ ठाण्यातच नाही तर जिल्ह्यातही वाढत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचे १२ आमदार आहेत. त्यात विधानसभेचे ९ आणि विधानपरिषदेच्या ३ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई आणि मिराभार्इंदरवर भाजपचेच वर्चस्व आहे. ठाण्यातही भाजप कुठेही कमी दिसत नसल्याचा दावा भाजपच्या स्थानिक मंडळींकडून केला जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप हा मोठा भाऊ असल्याने किमान दोन जागा भाजपला मिळाव्यात असा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यात भिवंडी नंतर ठाण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरु आहेत.

भाजपकडून वारंवार ठाणे लोकसभेवर दावा केला जात असतांना शिवसेना देखील ही जागा सोडणार नसल्याचे सांगत आहे. त्यात बुधवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उमेदवार कोणीही असला तरी आपल्याला मोदी यांनाच निवडून आणयाचे असल्याचा प्रचार शिवसेना आणि भाजपकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे उमेदवार कोणीही द्या आम्ही प्रचारात कुठेही मागे पडणार नसून उमेदवार जाहीर करावा अशी मागणी राष्टÑवादीने केली आहे. मोदींनाच जर निवडून आणायचे आहे, तर मग ठाणे लोकसभेवर शत प्रतिशत कमळच फुलले गेले पाहिजे अशी सोशल मिडियावर भाजपकडून चर्चा सुरु झाली आहे. ठाण्याची जागा जिंकायची असेल तर भाजप शिवाय पर्याय नसल्याचेही सांगितले जात आहे. भाजपच्या सोशल मिडियावर सध्या याच मुद्यावरुन जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा केल्याचेच यातून दिसत आहे. त्यामुळे आता ही जागा कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा