शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कलानींसाठी भाजपाची धडपड, महापौरपदाचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 03:03 IST

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदी भाजपाच्या पंचम कलानी की, शिवसेनासमर्थक साई पक्षाच्या ज्योती भटिजा, याबाबत संभ्रम कायम असून साई पक्षाच्या फुटीर गटातून नगरसेवक शेरी लुंड आणि कांचन लुंड भाजपाच्या डेऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. दुसरीकडे फुटीर गटाचे टोणी सिरवाणी यांनी आपणास विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदी निवडल्याचा दावा ...

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदी भाजपाच्या पंचम कलानी की, शिवसेनासमर्थक साई पक्षाच्या ज्योती भटिजा, याबाबत संभ्रम कायम असून साई पक्षाच्या फुटीर गटातून नगरसेवक शेरी लुंड आणि कांचन लुंड भाजपाच्या डेऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. दुसरीकडे फुटीर गटाचे टोणी सिरवाणी यांनी आपणास विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदी निवडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांसाठी सिरवाणी आणि इदनानी यांनी दोघांनीही व्हिप जारी केल्याने नगरसेवक संभ्रमित झाले आहेत.उल्हासनगरच्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता होत आहे. पंचम कलानी यांनी भाजपाच्या वतीने तर ज्योती भटिजा यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर उमेदवारी दाखल केली आहे. भटिजा साई पक्षाच्या फुटीर गटाच्या नगरसेविका असून विभागीय आयुक्तांनी फुटीर गटाला मान्यता दिल्याचा दावा टोणी सिरवाणी यांनी केला. सिरवाणी यांनी पक्षाच्या १२ नगरसेवकांना भटिजा यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला. त्यापूर्वी साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी गटनेतेपदी आपण असल्याचे सांगून पंचम कलानी यांना मतदान करण्याचा व्हिप नगरसेवकांना बजावला आहे. साई पक्षाचे नगरसेवक या प्रकाराने संभ्रमित झाले आहेत.भाजपा-ओमी टीमचे एकूण ३२ नगरसेवक आहेत. त्यापैकी पूजा भोईर यांचे सदस्यत्व यापूर्वीच रद्द झाले असून नगरसेवक सोनू छापरू यांचे सदस्यत्व जातपडताळणी समितीने रद्द केल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांचे सदस्यत्व रद्द झाले, तर भाजपा-ओमी टीमच्या नगरसेवकांची संख्या ३० राहणार आहे. साई पक्षाचे ७, राष्ट्रवादी बंडखोर-१, भारिप व काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी १ असे एकूण ४० नगरसेवक भाजपा आघाडीकडे आहेत. बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. साई पक्षाच्या फुटीर गटाच्या उमेदवार ज्योती भटिजा यांच्याकडे शिवसेनेचे २५, रिपाइं-पीआरपी गटाचे ३, साई फुटीर गटाचे ५, राष्ट्रवादीचे ३ असे एकूण ३६ नगरसेवक आहेत. भाजपा आघाडीकडील काँग्रेस व भारिपच्या नगरसेवकांना वरिष्ठांनी भटिजा यांना मतदान करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.साई पक्षाच्या कोणत्या गटनेत्याचा व्हिप लागू?साई पक्षात टोणी सिरवाणी व जीवन इदनानी दोघेही स्वत:ला गटनेते असल्याचे सांगत आहेत. दोघांनीही पक्षाच्या १२ नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी टोणी सिरवानी यांना गटनेतेपदी निवडले असेल, तर त्यांचा व्हिप पक्षाच्या १२ नगरसेवकांना लागू होणार असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा महापौर बनण्याची आशा आहे.काँग्रेस, भारिपच्या नगरसेवकांवर दबावआंबेडकरी चळवळीचे प्राबल्य असलेल्या सुभाष टेकडी परिसरातून काँग्रेस पक्षाच्या अंजली साळवे व भारिपच्या कविता बागुल निवडून आल्या आहेत. त्या भाजपासारख्या पक्षाच्या डेºयात दाखल झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधून भाजपाच्या पंचम कलानींऐवजी साई पक्षाच्या ज्योती भटिजा यांना मतदान करण्याचे आदेश त्यांना दिल्याची चर्चा आहे.पालकमंत्र्यांकडून खरडपट्टी : साई पक्षाच्या फुटीर गटाच्या एकूण सात नगरसेवकांपैकी शेरी लुंड व कांचन लुंड भाजपाच्या डेºयात दाखल झाले. त्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी शिवसेना व साई पक्षाच्या स्थानिक नेत्यांची खरडपट्टी काढली. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेचे सत्तेचे स्वप्न भंगणार असल्याचेही बोलले जात आहे.उल्हासनगरचा सौदा झालाच नव्हता : सेनेचा दावाउल्हासनगर : कल्याण महापालिकेच्या महापौरपदाच्या मोबदल्यात भाजपाला स्थायी समिती सभापतीपद दिले. उल्हासनगरात भाजपाला मदत करण्याची चर्चाच कधी झाली नाही, असा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी लोकमतकडे केला. उल्हासनगरच्या महापौर निवडणुकीत शिवसेना साई पक्षासोबत असल्याचे सांगून त्यांनी थेट भाजपाला लक्ष्य केले.साई पक्षामुळे सत्तेला दगाफटका होऊ शकतो, हे ओळखून भाजपाने कल्याण महापालिकेच्या महापौर निवडणुकीत स्वत:च्या वाट्याला आलेले महापौरपद शिवसेनेला दिले आणि त्याबदल्यात उल्हासनगरात मदत करण्याचे आश्वासन शिवसेनेकडून घेतले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.भाजपाची सत्ता साई पक्षातील फुटीमुळे संकटात सापडली. शिवसेनेने महापौरपदाचा उमेदवार रिंगणात न उतरवता साई पक्षाच्या मागणीनुसार त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. महापौर निवडणुकीदरम्यान भाजपाने शिवसेनेशी संपर्कच साधला नसल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे लांडगे म्हणाले.पालिकेला पोलीस छावणीचे स्वरूपनिवडणुकीसाठी पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १२५ पोलीस, दोन सहायक पोलीस आयुक्त, चार निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, तसेच राज्य राखीव दलासह पोलीस परिमंडळ-४ ची राखीव तुकडी तैनात केले आहेत.सेना युती धर्म पाळतनाही : आमदार पवारकल्याण : उल्हासनगरच्या मोबदल्यात कल्याणच्या महापौरपदावर पाणी सोडणाºया भाजपामध्ये शिवसेनेच्या भूमिकेमुळे असंतोष निर्माण झाला असून सेना युती धर्म पाळत नसल्याचा आरोप भाजपाचे आमदार तथा प्रदेश सचिव आणि उल्हासनगरचे प्रभारी नरेंद्र पवार यांनी केला आहे.कल्याणमध्ये भाजपाची टर्म असतानाही सेनेला महापौरपद देण्यात आले होते. भाजपाने त्यावेळी शब्द पाळला होता. त्यामुळे उल्हासनगर महापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला महापौरपदासाठी पाठिंबा देणे नैतिकदृष्ट्या गरजेचे होते; परंतु साई पक्षाच्या फुटीर गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेने गद्दारी केली आहे. प्रत्येकवेळेला शिवसेना काही-ना-काही कारण काढून पळवाटा शोधते. केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपासोबत सत्तेमध्ये आहे. परंतु शिवसेनेकडून युतीचा धर्म पाळला जात नाही, असा आरोप नरेंद्र पवार यांनी केला.परिवहन निवडणुकीत गद्दारीभाजपाच्या एका माजी परिवहन सदस्यानेही शिवसेनेच्या भूमिकेवर तोंडसुख घेतले आहे. केडीएमसी परिवहन समितीच्या निवडणुकीत सभापती निवडीच्यावेळीही शिवसेनेने मनसेला पाठिंबा देऊन भाजपाशी गद्दारी केल्याचे स्मरण दिले.भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९0 च्या दशकात ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या मुद्यावरून रान पेटवले होते. त्यामुळेच १९९५ मध्ये युतीची सत्ता आली. त्यावेळी मुंडे यांनी लक्ष्य केलेले पप्पू कलानी यांची सून पंचम हिच्या विजयाकरीता सध्या भाजपाची घालमेल सुरू आहे. शिवसेनेनी साई पक्षात फूट पाडून आपल्या मित्राला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे भाजपाच्या पाठिंब्यावर पंचम महापौर झाल्याचे कलानी कुटुंबाचे स्वप्न साकार होणार किंवा कसे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाulhasnagarउल्हासनगर