शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सरकारविरोधात अंबरनाथला भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:34 IST

आंदोलनात अंबरनाथ,बदलापूर तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंबरनाथ : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना -काँंग्रेस- राष्ट्रवादी काँंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपने मंगळवारी सकाळी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात अंबरनाथ,बदलापूर तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बहुसंख्य शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांबाबत कर्जमाफी योजनेत कोणताच उल्लेख नाही.गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महविकास आघाडी सरकारचा भाजप निषेध करत असल्याचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील, अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील, पश्चिम अध्यक्ष ,राजेश कौठाळे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता भोईर, माजी शहराध्यक्ष विजय खरे, नगरसेविका अनिता भोईर आदी उपस्थित होते.मुरबाडमध्ये निषेध मोर्चामुरबाड : शेतकºयांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आणि लोकोपयोगी विकासकामांना स्थगितीदेण्याच्या विरोधात भाजपने मंगळवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे अंदोलन केले. यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपा