शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

घरांच्या करमाफीवरून भाजपची आक्रमक भूमिका; महासभेत शिवसेनेला घेरले, सत्ताधारी निरुत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 3:59 AM

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते.

ठाणे : गुरुवारी भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी केव्हा? असा सवाल केला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेतदेखील ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. ठाणेकरांना करमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तर काँग्रेसने किमान झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तसेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना किमान तीन महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी केली. मात्र, यावरून सत्ताधारी शिवसेना निरुत्तर झालेली दिसली.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते. त्याचीच आठवण भाजप आणि मनसेकडून करून दिली जातआहे.गुरुवारी याच मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केले होते. तर भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला या वचनाची आठवण करून दिलीहोती.त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, भरत चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेला या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. परंतु, यावर शिवसेनेकडून काहीच उत्तर मिळाले नाही.शिवसेना नगरसेविकांचा काँग्रेसला पाठिंबादुसरीकडे निवडणुकीत शिवसेनेने काय वचन दिले होते, ते आम्हाला माहीत नाही. मात्र, कोरोनामुळे अनेकांचे हाल झालेले आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, नोकºया गेल्या, पगार कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कटलेले आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात राहणाºया किंवा दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना तीन महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केली. याला पाठिंबा देऊन तीन महिने नाही, तर पाच महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर आणि मालती पाटील यांनी केली. परंतु, यावर योग्य असे उत्तर न मिळाल्याने मध्येच हा विषय थांबला गेला.

टॅग्स :thaneठाणे