शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

भाजपाने पालघर चिटिंग करून जिंकले- आदित्य ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:15 AM

पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली.

ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेतेतथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. पालघरच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन होते, म्हणून भाजपा जिंकली. परंतु, सिनेटच्या निवडणुकीत आणिआता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने ही निवडणूक शिवसेना जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने संजय मोरे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा रेमण्ड हॉल येथे आयोजित केला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. जेव्हा शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढल्या, तेव्हा आपण जिंकलो आहोत. पालघरमध्येही खरेतर आपण जिंकलो आहोत. मात्र, ईव्हीएमने भाजपाच्या पदरात यशाचे माप टाकले. भाजपाच्या ‘चुनावी जुमल्या’विषयी बोलण्याचा आता कंटाळा आला असून दोन कोटी रोजगार देण्यावरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. उलट, नोटाबंदीमुळे ४० लाख रोजगार गेले, अशी टीका त्यांनी केली.आजच्या शिक्षणामुळे रोजगार मिळेल का, स्वयंरोजगार करता येईल का, याची खात्री तरुणांना राहिलेली नाही. त्यामुळेच शिवसेना शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करत आहे. मुंबई विद्यापीठातील गोंधळाकरिता शिवसेनेमुळेच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला, हे आपले मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.शिवसैनिक पेटून उठला की काय होते, ते सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकून आपण दाखवले. त्यामुळेच विधान परिषदेच्याही अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.