शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

केडीएमसीत रंगणार शिवसेना विरुद्ध भाजप सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:31 IST

स्थायी समितीत सभापतीपद निवडणूक; शिवसेनेकडून कोट, भाजपकडून म्हात्रेंचा अर्ज, बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले

कल्याण : राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत उमटले आहेत. सभापतीपदासाठी बुधवारी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेतर्फे गणेश कोट यांनी तर, भाजपतर्फे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे शुक्रवारी होणारी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसला आहे. मात्र, आमचे संख्याबळ जास्त असल्याने आमचाच सभापती होणार, असा दावा शिवसेनेने केला आहे.स्थायी समितीत १६ पैकी आठ सदस्य हे शिवसेनेचे आहेत. भाजपचे सहा सदस्य, तर राष्ट्रवादी व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. शिवसेनेकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ आहे. मात्र, भाजपकडे सहा सदस्य असल्याने त्यांना राष्ट्रवादी व मनसेची मदत घ्यावी लागेल. मात्र, राज्याच्या सत्ता स्थापनेत महाविकास आघाडीत मनसे तटस्थ राहिली. तर, राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेत एकत्रित आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला मिळणार हे स्पष्ट आहे. तरीही, भाजपचे उमेदवार म्हात्रे यांनी आपल्याला राष्ट्रवादी व मनसेची साथ मिळणार असल्याचा दावा केला आहे. मनसे व राष्ट्रवादीने भाजपला साथ देण्याचे ठरविले तरी, शिवसेना व भाजप यांच्या उमेदवारांचे संख्याबळ हे समसमान होते. त्यामुळे चिठ्ठी टाकून सभापतींची निवड करण्याची वेळ येऊ शकते. सभापतीपदासाठी म्हात्रे हे प्रबळ दावेदार आहेत. सभापतीपदासाठी भाजपकडून घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हात्रे हे स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे सदस्य फोडण्याचे राजकारण भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे.२०१५ मध्ये महापालिकेत सत्ता स्थापन करताना शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या बोलणीनुसार महापौरपद प्रत्येकी दोन वर्षे शिवसेनेच्या सदस्याला तर, त्यानंतर शेवटचे वर्ष भाजपच्या सदस्याला दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, राज्यात युती तुटल्याने स्थानिक पातळीवर महापौरपद भाजपला देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ‘स्टॅण्डिंग’साठी ‘राजकीय अंडरस्टॅण्डिंग’ न करण्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.मागच्या वेळेत स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे गणेश कोट व जयवंत भोईर हे इच्छुक होते. मात्र, पक्षाने दीपेश म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने कोट व भोईर यांनी त्यांच्या स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पक्षाच्या ठाणे जिल्हा नेतृत्वाने कोट व भोईर यांची समजूत काढून त्यांना पुन्हा स्थायी समिती सदस्यपदी निवडले होते. दीपेश यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शुक्रवारी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. कोट यांना शब्द दिला असल्याने व शिवसेनेतून अन्य कोणी दावेदार नसल्याने कोट यांच्या नावाचा खलिता पक्षाकडून महापालिकेत बुधवारी दुपारी आला. त्यानुसार, शिवसेनेतर्फे कोट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवक कासीब तानकी यांना यापूर्वी स्थायी समितीचे सदस्यत्व दिले होते. त्यानंतर, पुन्हा त्यांना शिवसेनेने सदस्यपदाची संधी दिली आहे. सभापतीपदासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कोट यांना पक्षाने शब्द दिला असल्याने तानकी यांच्या मागणीचा विचार झालेला नाही.तानकी यांनी उपमहापौरपदासाठीही मागच्या वेळी उमेदवारी भरला होता. शिवसेनेने समजूत काढल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.‘महिला-बालकल्याण’साठी एकमेव अर्जमहिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका वीणा जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.महिला बालकल्याण समितीमध्ये शिवसेनेचे पाच, भाजपचे चार, काँग्रेस एक आणि मनसे एक असे संख्याबळ आहे.भाजपने या समितीवर दावा सांगितलेला नाही. यापूर्वी भाजप नगरसेविका रेखा चौधरी या समितीच्या सभापती होत्या.स्थायी समिती ही महापालिकेच्या अर्थकारणाची तिजोरी असल्याने शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपतर्फे म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा