शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

शिवसेना आमदाराचा विकासनिधी पळवण्याचा भाजपाचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 23:05 IST

शासनानंच उधळला भाजपाचा प्रयत्न

मीरारोड - शासनाने महापालिकेतील विकासकामांसाठी शिवसेना आमदाराच्या प्रभागात दिलेला ५ कोटी रुपयांचा निधी महासभेत ठराव करुन अन्यत्र वळवण्याच्या सत्ताधारी भाजपाच्या प्रयत्नास शासनानेच खिळ घातली आहे. सदर कामांसाठी महापालिकेच्या ठरावाची गरज नसल्याचे स्पष्ट करत महापौरांचे कान उपटले आहेत. सेनेच्या आमदाराने कामांसाठी आणलेला निधीची भाजपाकडून पळवापळवी झाल्याने सेनेत मात्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाने महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास या अंतर्गत निधी वितरित केला होता. त्या निधीतील ५ कोटी रुपयांची कामे ही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा मतदारसंघातील होती. घोडबंदर गाव व परिसराचा विकास करण्यासाठी ४० लाख रुपये; वरसावे, माशाचा पाडा व डाचकुल पाडा येथे स्मशानभूमीच्या कामासाठी प्रत्येकी २० लाख रुपये तर चेणे गावाकडे जाणारा रस्ता व नदी पुलासाठी ४ कोटी रुपयांची कामं शासनाने मंजूर केली होती.

परंतु राज्य शासनाकडून सेना आमदाराच्या मतदार संघातील आलेल्या सदर कामांसाठीचा पाच कोटी रूपयांचा निधी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या मतदारसंघातील कामांसाठी खर्च करण्याचा सत्ताधारी भाजपाने १९ सप्टेंबरच्या महासभेत आणून तसा ठराव केला होता. सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी मांडलेल्या त्या ठरावास भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांनी अनुमोदन दिले होते . महापौर डिंपल मेहता यांनी ठराव मंजूर करून घेतला .

आपल्या मतदार संघातील कामांसाठी मिळालेला ५ कोटींचा निधी भाजपा आमदाराच्या मतदार संघात भाजपाने पळवण्यासाठी ठराव केल्याचे कळताच सरनाईक यांनी या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुध्दा कळवले. निधी पळवण्याचा हा प्रकार पाहून शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र पाठवले. घोडबंदर, चेणे, वरसावे या भागातील ५ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर असल्याचे कळवत त्या कामांसाठी महापालिकेच्या ठरावाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रताप सरनाईक (आमदार, शिवसेना) - बहुमताच्या मस्तीने स्थानिक भाजपा नेते खालच्या थराला उतरले आहेत. मीरा भार्इंदर भाजपाची ही भुरटेगिरी शासनानेच उधळून लावली आहे.

रोहिदास पाटील ( सभागृह नेते ) - प्रशासनाने कामांचे प्रस्ताव दिले होते. सत्ताधारी म्हणून आम्हाला जी कामं आवश्यक वाटली तसा ठराव केला. शेवटी विकासकामांसाठीच निधी खर्च होणार होता. त्यामुळे पळवापळवीचा प्रश्नच नाही. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाmira roadमीरा रोड