शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

शिवसेना आमदाराचा विकासनिधी पळवण्याचा भाजपाचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 23:05 IST

शासनानंच उधळला भाजपाचा प्रयत्न

मीरारोड - शासनाने महापालिकेतील विकासकामांसाठी शिवसेना आमदाराच्या प्रभागात दिलेला ५ कोटी रुपयांचा निधी महासभेत ठराव करुन अन्यत्र वळवण्याच्या सत्ताधारी भाजपाच्या प्रयत्नास शासनानेच खिळ घातली आहे. सदर कामांसाठी महापालिकेच्या ठरावाची गरज नसल्याचे स्पष्ट करत महापौरांचे कान उपटले आहेत. सेनेच्या आमदाराने कामांसाठी आणलेला निधीची भाजपाकडून पळवापळवी झाल्याने सेनेत मात्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाने महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास या अंतर्गत निधी वितरित केला होता. त्या निधीतील ५ कोटी रुपयांची कामे ही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा मतदारसंघातील होती. घोडबंदर गाव व परिसराचा विकास करण्यासाठी ४० लाख रुपये; वरसावे, माशाचा पाडा व डाचकुल पाडा येथे स्मशानभूमीच्या कामासाठी प्रत्येकी २० लाख रुपये तर चेणे गावाकडे जाणारा रस्ता व नदी पुलासाठी ४ कोटी रुपयांची कामं शासनाने मंजूर केली होती.

परंतु राज्य शासनाकडून सेना आमदाराच्या मतदार संघातील आलेल्या सदर कामांसाठीचा पाच कोटी रूपयांचा निधी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या मतदारसंघातील कामांसाठी खर्च करण्याचा सत्ताधारी भाजपाने १९ सप्टेंबरच्या महासभेत आणून तसा ठराव केला होता. सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी मांडलेल्या त्या ठरावास भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांनी अनुमोदन दिले होते . महापौर डिंपल मेहता यांनी ठराव मंजूर करून घेतला .

आपल्या मतदार संघातील कामांसाठी मिळालेला ५ कोटींचा निधी भाजपा आमदाराच्या मतदार संघात भाजपाने पळवण्यासाठी ठराव केल्याचे कळताच सरनाईक यांनी या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुध्दा कळवले. निधी पळवण्याचा हा प्रकार पाहून शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र पाठवले. घोडबंदर, चेणे, वरसावे या भागातील ५ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर असल्याचे कळवत त्या कामांसाठी महापालिकेच्या ठरावाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रताप सरनाईक (आमदार, शिवसेना) - बहुमताच्या मस्तीने स्थानिक भाजपा नेते खालच्या थराला उतरले आहेत. मीरा भार्इंदर भाजपाची ही भुरटेगिरी शासनानेच उधळून लावली आहे.

रोहिदास पाटील ( सभागृह नेते ) - प्रशासनाने कामांचे प्रस्ताव दिले होते. सत्ताधारी म्हणून आम्हाला जी कामं आवश्यक वाटली तसा ठराव केला. शेवटी विकासकामांसाठीच निधी खर्च होणार होता. त्यामुळे पळवापळवीचा प्रश्नच नाही. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाmira roadमीरा रोड