शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सरकारच्या निर्णयाला भाजपाने धुडकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:10 IST

विकास आराखड्याचा मुद्दा; सहा महिने मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेमध्ये केला मंजूर

मीरा रोड : ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलेल्या मीरा- भार्इंदर विकास आराखडा घोटाळ्याप्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारनेच प्रारूप आराखडा रद्द करून सरकारच्या वतीने नवीन अधिकारी नेमून पुन्हा आराखडा तयार केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, गुरुवारच्या महासभेत आयुक्तांच्या गोषवाऱ्यानुसार सत्ताधारी भाजपाने सरकारच्या निर्णयास केराची टोपली दाखवत सहा महिन्यांच्या मुदतवाढीचा व तीन महिन्यांत आराखडा महासभेत सादर करण्याचा ठराव मंजूर केला. वास्तविक, सहा महिन्यांची मुदत जूनमध्येच संपली आहे.मीरा-भार्इंदरच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्याचा इरादा एप्रिल २०१५ मध्ये महासभेने मंजूर केल्यावर मार्च २०१६ मध्ये नगररचना अधिकारी म्हणून दिलीप घेवारे यांची नियुक्ती झाली. डिसेंबर २०१५ मध्ये इराद्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून दोन वर्षांच्या आत आराखडा प्रसिद्ध करायला हवा होता. सुधारित प्रारूप विकास आराखडा फुटल्याचा प्रकार समोर आला. स्थानिक भाजपा नेत्याचा प्रभाव असल्याचे आरोप झाल्याने सत्ताधारी भाजपाने, तर आराखडा फुटीची बातमी खोटी ठरल्यास थेट पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्याचा ठराव केला होता.आराखडा वादग्रस्त ठरल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडला असता नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्रारूप आराखडा रद्द करून नवीन अधिकारी नेमून पुन्हा नव्याने प्रारूप तयार करण्याचे काम केले जाईल, असे जाहीर केले होते.महासभेत आयुक्तांनी दिलेल्या गोषवाºयात सरकारच्या निर्णयाचा उल्लेखच नव्हता. महापालिका व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी वगळून सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, असे त्यात नमूद केले होते. वास्तविक, डिसेंबर २०१७ मध्ये दोन वर्षांची मुदत संपली असल्याने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली, तरी जूनमध्ये ती संपलेली आहे. पण, आचारसंहितेचा कालावधी वगळण्याची टूम पालिकेने पुढे केली आहे. यामुळे पुन्हा एकदा यावरून वातावारण तापणार आहे.‘त्या’ अधिकाºयाकडे आराखडा कसा?महासभेत चर्चेवेळी काँग्रेसचे अनिल सावंत यांनी कार्यमुक्त झालेल्या अधिकाºयाकडे चार महिने पालिकेचा आराखडा राहिला कसा, असा प्रश्न करत कारवाईची मागणी केली. तसेच सरकारने आराखडा रद्द केल्याचा आदेश दिल्याबद्दलही विचारणा केली.आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन त्यावर दिले. परंतु, भाजपाचे प्रशांत दळवी यांनी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासह तीन महिन्यांत आराखडा महासभेत सादर करण्याचा ठराव मांडला व तो मंजूर झाला. आता हा ठराव सरकारकडे पाठवला जाणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडbhayandarभाइंदरBJPभाजपा