शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजपाची स्वबळावर लढण्याची तयारी?; रावसाहेब दानवेंनी घेतला कल्याण लोकसभेचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:43 IST

आगामी लोकसभा निवडणूकीत केंद्रामध्ये भाजपसमवेत शिवसेनेची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण लोकसभेसंदर्भात प्रमुख पदाधिका-यांसह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

डोंबिवली: आगामी लोकसभा निवडणूकीत केंद्रामध्ये भाजपसमवेत शिवसेनेची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण लोकसभेसंदर्भात प्रमुख पदाधिका-यांसह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी १ बुथ २६ कार्यकर्ते असे समीकरण स्पष्ट केल्याने भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी एकप्रकारे सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकीकडे जरू युतीचे संकेत दिले जात असले तरी दुसरीकडे बुथ रचना मजबूत करण्यासाठी राज्यभरातील ४८ लोकसभा जागांच्या ठिकाणी दानवे जात असल्याने पक्ष स्ववळावर लढणार असल्याचे संकेत दिल्याचे स्पष्ट झाले.दानवे यांनी कल्याणमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेत पक्षाचे ‘बुथ’चे समीकरण स्पष्ट केले. तसेच कल्याण लोकसभेचा उमेदवार नेमका कोण असेल असा प्रश्न विचारला असता ते पक्ष ठरवतो असे सूचकपणे स्पष्ट केले. राज्यातील ९० हजार बुथ रचनेपैकी सुमारे ८८ हजार ठिकाणची रचना पूर्ण झाली असून अन्य ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे दानवे म्हणाले. कार्यकर्ते सक्रिय करणे, आणि पक्षाच्या कार्याची माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सध्या २८८ विस्तारक पक्षाचा विस्तार करत असून त्यापैकी ४८ पुर्णवेळ विस्तारक असल्याचे ते म्हणाले. एका बुथवर २६ जणांची टीम कार्यरत असेल. एका कार्यकर्त्यांनी किमान ६० मतदारांना मतदान करायला लावायचे त्या दृष्टीने कार्यकर्ता सक्रिय करणे हाच दौ-यांमागचा मुख्य उद्देश असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला. युती होणार की नाही या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती संधी द्यायची असून आमच्याकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे युती होणार यात आमच्या मनात कसलाही संदेह नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी चलो अयोध्याची हाक दिली आहे, त्यांच्या त्या भूमिकेला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. नाराज आमदार अनिल गोटे यांची नाराजी लवकरच पक्ष दूर करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रूपयांचे पॅकेज जाहिर केले होते त्याचे काय झाले? त्यावर दानवेंनी अजून राज्यातील सत्तेची पाच वर्षे पूर्ण व्हायची असून लवकरच तो निधी कसा दिला आहे याबाबत माहिती देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा प्रभारी नरेंद्र पवार, खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाthaneठाणे