शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारची तीन वर्षे; राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 14:10 IST

भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली.

ठाणे - भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.  दरम्यान, देशात आणि राज्यात सध्या अराजकता माजली असून सर्वच संकटांनी जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जसे इंग्रजांना गो बॅक म्हणत हाकलून लावले हेते. आता या सरकारलाही जनताच गो बॅक करणार आहे, असे यावेळी आनंद परांजपे यांनी म्हंटलं.

फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करुन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. चिक्की- भूखंड घोटाळे, लहान अर्भकांचे मृत्यू, महिलांवरील अत्याचार आदी प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला भाजप- शिवसेना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने छेडणार आहे. या आंदोलनांची सुरुवात ठाणे शहरातून झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, तीन वर्षात केलं काय? चिक्की खाल्ली दुसरं काय, अच्छे दिन गायब झाले बुरे दिन नशिबी आले , मोदी सरकारने गायब केले रेशन; गरीबांना ऐकावे लागते नुसते भाषण; वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा  तेल,  अन्न झाले महाग , मरण झाले स्वस्त   भाजपचे सरकार झाले मदमस्त; भाजप सरकार की क्या पहचान ,महंगा जिना, सस्ताईमे  लेते जान आदी घोषणा देत जोरदार निदर्शने केली.  या आंदोलनात नगरसेवक  प्रकाश बर्डे, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी,  मोरेश्वर किणी, परिवहन सदस्य सुरेंद्र उपाध्याय, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, माजी नगरसेवक सुरेखा पाटील, अमीत सरय्या, सरचिटणीस प्रभाकर सावंत, संतोष तिवारी, संदीप जाधव, आदी सहभागी झाले होते.     

यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, तीन वर्षात जनतेचे हित साधण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकच्या सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी लहान मुले दगावली आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रोजगार निर्मितीमध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.  ना खाऊंगा.. ना खाने दुँगा असे म्हणणाऱ्यांच्याच सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टचाराने बरबटले आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.   महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात या सरकारच्या विरोधात मोहीम राबवून त्यांना घरात बसवू, असे ते म्हणाले.