शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

भाजप सरकारची तीन वर्षे; राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 14:10 IST

भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली.

ठाणे - भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.  दरम्यान, देशात आणि राज्यात सध्या अराजकता माजली असून सर्वच संकटांनी जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जसे इंग्रजांना गो बॅक म्हणत हाकलून लावले हेते. आता या सरकारलाही जनताच गो बॅक करणार आहे, असे यावेळी आनंद परांजपे यांनी म्हंटलं.

फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करुन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. चिक्की- भूखंड घोटाळे, लहान अर्भकांचे मृत्यू, महिलांवरील अत्याचार आदी प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला भाजप- शिवसेना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने छेडणार आहे. या आंदोलनांची सुरुवात ठाणे शहरातून झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, तीन वर्षात केलं काय? चिक्की खाल्ली दुसरं काय, अच्छे दिन गायब झाले बुरे दिन नशिबी आले , मोदी सरकारने गायब केले रेशन; गरीबांना ऐकावे लागते नुसते भाषण; वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा  तेल,  अन्न झाले महाग , मरण झाले स्वस्त   भाजपचे सरकार झाले मदमस्त; भाजप सरकार की क्या पहचान ,महंगा जिना, सस्ताईमे  लेते जान आदी घोषणा देत जोरदार निदर्शने केली.  या आंदोलनात नगरसेवक  प्रकाश बर्डे, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी,  मोरेश्वर किणी, परिवहन सदस्य सुरेंद्र उपाध्याय, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, माजी नगरसेवक सुरेखा पाटील, अमीत सरय्या, सरचिटणीस प्रभाकर सावंत, संतोष तिवारी, संदीप जाधव, आदी सहभागी झाले होते.     

यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, तीन वर्षात जनतेचे हित साधण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकच्या सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी लहान मुले दगावली आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रोजगार निर्मितीमध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.  ना खाऊंगा.. ना खाने दुँगा असे म्हणणाऱ्यांच्याच सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टचाराने बरबटले आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.   महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात या सरकारच्या विरोधात मोहीम राबवून त्यांना घरात बसवू, असे ते म्हणाले.