शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

भाजप सरकारची तीन वर्षे; राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 14:10 IST

भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली.

ठाणे - भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.  दरम्यान, देशात आणि राज्यात सध्या अराजकता माजली असून सर्वच संकटांनी जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जसे इंग्रजांना गो बॅक म्हणत हाकलून लावले हेते. आता या सरकारलाही जनताच गो बॅक करणार आहे, असे यावेळी आनंद परांजपे यांनी म्हंटलं.

फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करुन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. चिक्की- भूखंड घोटाळे, लहान अर्भकांचे मृत्यू, महिलांवरील अत्याचार आदी प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला भाजप- शिवसेना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने छेडणार आहे. या आंदोलनांची सुरुवात ठाणे शहरातून झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, तीन वर्षात केलं काय? चिक्की खाल्ली दुसरं काय, अच्छे दिन गायब झाले बुरे दिन नशिबी आले , मोदी सरकारने गायब केले रेशन; गरीबांना ऐकावे लागते नुसते भाषण; वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा  तेल,  अन्न झाले महाग , मरण झाले स्वस्त   भाजपचे सरकार झाले मदमस्त; भाजप सरकार की क्या पहचान ,महंगा जिना, सस्ताईमे  लेते जान आदी घोषणा देत जोरदार निदर्शने केली.  या आंदोलनात नगरसेवक  प्रकाश बर्डे, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी,  मोरेश्वर किणी, परिवहन सदस्य सुरेंद्र उपाध्याय, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, माजी नगरसेवक सुरेखा पाटील, अमीत सरय्या, सरचिटणीस प्रभाकर सावंत, संतोष तिवारी, संदीप जाधव, आदी सहभागी झाले होते.     

यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, तीन वर्षात जनतेचे हित साधण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकच्या सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी लहान मुले दगावली आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रोजगार निर्मितीमध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.  ना खाऊंगा.. ना खाने दुँगा असे म्हणणाऱ्यांच्याच सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टचाराने बरबटले आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.   महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात या सरकारच्या विरोधात मोहीम राबवून त्यांना घरात बसवू, असे ते म्हणाले.