शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 08:51 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळविण्य़ाचे काम करत आहेत. (Fire breaks out at a  factory in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area of Ambernath, Thane. )

अंबरनाथ एमआयडीसी भागातील आर. के  बेकवेलमार्क या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने महाशिवरात्रीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना बंद होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.     अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मध्ये ही कंपनी असून या कंपनीला पहाटे सहा वाजता अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कंपनी या आगीच्या कचाट्यात सापडली. आगीची माहिती मिळताच आनंद नगर एमआयडीसी चे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण सह तळोजा एमआयडीसीतील अग्निशामक गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने कंपनीत सुरक्षा रक्षक वगळता कोणताही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. या आगी मागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली होती. यामध्ये तीन युनीट जळून खाक झाले होते. तर कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील मीटर बॉक्सला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. यामध्ये त्या इमारतीमधील ३२ मीटर बॉक्स जाळून खाक झाले होते. 

 

हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाले होते.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथ