शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 08:51 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळविण्य़ाचे काम करत आहेत. (Fire breaks out at a  factory in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area of Ambernath, Thane. )

अंबरनाथ एमआयडीसी भागातील आर. के  बेकवेलमार्क या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने महाशिवरात्रीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना बंद होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.     अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मध्ये ही कंपनी असून या कंपनीला पहाटे सहा वाजता अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कंपनी या आगीच्या कचाट्यात सापडली. आगीची माहिती मिळताच आनंद नगर एमआयडीसी चे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण सह तळोजा एमआयडीसीतील अग्निशामक गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने कंपनीत सुरक्षा रक्षक वगळता कोणताही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. या आगी मागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली होती. यामध्ये तीन युनीट जळून खाक झाले होते. तर कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील मीटर बॉक्सला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. यामध्ये त्या इमारतीमधील ३२ मीटर बॉक्स जाळून खाक झाले होते. 

 

हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाले होते.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथ