शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मातृभाषेसाठी डोंबिवलीच्या तरुणाची भारतभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:08 AM

करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात.

डोंबिवली : करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात. मात्र, तरीही पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांकडेच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घ्या आणि मातृभाषेचा अभ्यास करा, असा संदेश देण्यासाठी डोंबिवलीतील गंधार कुळकर्णी यांनी ५०० दिवसांची सायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखली आहे. ती पूर्ण झाल्यावर भाषा अध्यायन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे आणि नावीन्यपूर्ण मॉडेल तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.गंधार हे १ जुलैला डोंबिवलीहून या भ्रमंतीला प्रारंभ करतील. १२ जुलैपर्यंत ते नागपूरला पोहोचतील. त्यापुढे १३ जुलैला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताच्या मार्गाने रामटेकहून निघून हरिद्वारला जाणार आहेत. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जोडणारा, असा त्यांनी पुढचा मार्ग आखला आहे. या संपूर्ण प्रवासात ते २० हजार किलोमीटर सायकल चालविणार आहेत. दररोज एका शाळेत दीड ते दोन तास जाऊन ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी ‘भाषेचे अध्ययन आणि अध्यापन’ या विषयावर संवाद साधणार आहेत. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा, यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वत:च्या भाषेविषयी जाणीव करून देणे, स्थानिक बोलींची ओळख व्हावी, यावर त्यांचा भर असणार आहे. तसेच त्यासाठी शब्दांची एक यादी त्या-त्या बोलीत अनुवादित करून घेणे, भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्याच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघावे, याची जाणीव ते या मोहिमेत करणार आहेत.प्रयोगशीलतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे केवळ नोकरदार वर्ग निर्माण होत आहे. शिक्षणाचे हे स्वरूप बदलले पाहिजे, असे कुलकर्णी म्हणाले. या मोहिमेत त्यांनी घरगुती निवासाची व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे सामानाची आणि स्वत:ची सुरक्षितता ठेवता येणार आहे. आपल्या भारतात ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती रूजलेली असल्याने या पद्धतीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम.एची पदवी मिळवली आहे. या विभागाने त्यांच्या या मोहिमची दखल घेतली आहे. ज्ञानप्रबोधिनी, डोंबिवली विस्तार केंद्राचा या मोहिमेत मोठा वाटा आहे. एका जर्मन कंपनीने त्यांना ३४ हजारांची हेलिक्स ३.५ आय ही सायकल देऊ केली आहे. असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदत ही प्रवासादरम्यान होणार आहे. भारत परिक्रमा करून आलेले सचिन गावकर यांचे मार्गदर्शन कुलकर्णी यांना लाभले आहे. या प्रवासात २०० शाळांना भेटी देण्याचा मानस आहे. त्यासाठी चार लाखांचा खर्च आहे.