शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

अधिकाऱ्यांना कचरा भोवला, २३ जणांचा पगार रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:52 AM

कचरा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियानाविषयी केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व प्रभाग क्षेत्र अधिकारी गंभीर नाहीत.

कल्याण : कचरा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियानाविषयी केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व प्रभाग क्षेत्र अधिकारी गंभीर नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह २३ जणांचे पगार रोखण्याचे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत.केडीएमसीकडून आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात दिरंगाई केली जात आहे. डम्पिंग बंद करण्यासाठी कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी प्रकल्प उभारले जात नाहीत. डम्पिंग रद्द करण्यासाठी ८ जुलैला मुख्यमंत्र्यांकडे भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्या मागणीनुसार बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या दिरंगाईविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच बोडके यांनाही फैलावर घेतले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पगार रोखा तसेच महापालिकेस दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले होते. त्यानंतर बोडके यांनी आधारवाडी डम्पिंगवर धाव घेतली होती. त्यावेळी त्यांनी डम्पिंगची पाहणी केल्यानंतर काम योग्य प्रकारे करा, अशी तंबी कामगारांना दिली. मात्र, आयुक्तांनी आता २३ जणांचे पगार बंद रोखण्याचे आदेश काढले आहेत. त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, दहा प्रभाग क्षेत्र अधिकारी, दोन साहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि दहा मुख्य आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.आयुक्तांनी या २३ जणांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, ‘महापालिका हद्दीतील कचरा वेळेवर उचलला जात नाही. स्वच्छ भारत अभियानांविषयी आपण गंभीर नाहीत. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी योग्य प्रकारे काम होत नाही. याबाबत आपल्याला जबाबदार धरण्यात येत आहे.’ मात्र, या कारवाईमुळे हे २३ जण धास्तावले आहेत. दुसरीकडे सोमवारीही आरोग्य अधिकाºयांची बैठक घेऊन पदाधिकाºयांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.>उपायुक्त अमित पंडित यांना नाहक फटकाकचरा कंत्राटदाराच्या मनमानीला लगाम घालण्यास घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन उपायुक्त धनाजी तोरसकर असमर्थ ठरले होते. तसेच कंत्राटी कामगारांच्या पगाराची बिलेही त्यांनी सादर केली नाहीत. अखेरीस आयुक्तांनी त्यांच्याकडून घनकचरा व्यवस्थापन आणि विधी विभागाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे नगरनियोजनाचा पदभार दिला. मात्र तोरसकर यांची वर्षभरापूर्वीच बदली झाली असताना त्यांना कार्यमुक्त का केले जात नाही, असा सवाल उपस्थित केला गेला. तर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी अमित पंडित यांची नियुक्ती करण्यात आली. तोरसकर यांच्या काळात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम असधानकारक झाले. मात्र, नोटीस पंडित यांना काढल्याने त्यांना त्याचा फटका बसला आहे. ते सध्या उपायुक्त असल्याने त्यांचाही पगार रोखला जाणार आहे. या अनागोंदीला आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी हेही तितकेच जबाबदार आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम केले जात नसल्याने त्यांनाही पगार बंदीची नोटीस बजावली आहे.