शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भिवंडीत आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 1:21 PM

मालकावर वेठबिगार व अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल 

भिवंडी: तालुक्यातील पाये , नाईकपाडा येथे राहणाऱ्या राजेश भोईर (24) व भिमा भोईर ( 22 ) या दोघा भावांना खार्डी गावातील निलेश तांगडी या मालकाने आपल्या सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात पिडीत तरुणांनी श्रमजिवी संघटनेच्या माध्यमातून तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989  कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

मालक निलेश तांगडी यांनी पिडीत तरुणांच्या 29 मे 2018 रोजी झालेल्या लग्न सोहळ्यासाठी 1 लाख 19 हजार 690 रुपये खर्च केला होता. त्याबाबत त्याने एका कागदावर लिहून दिले होते.त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनी दोघा भावांनी मालक निलेश तांगडी यांच्या मालकीच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्येकी 3 हजार 500 रुपये महिना वेतन देण्याचे निश्चित करून आठवड्याला प्रत्येकी 1 हजार रुपये दोघांना देण्याचे ठरवण्यात आले होते.तर दोघा भावांना घरी येण्या - जाण्यासाठी हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्तेही दर महिन्याला दोघांच्या पगारातून कपात केले जायचे.

कागदावर लग्नाचा खर्च लिहून दिल्यापासून दोन वर्षात आजपर्यंत दोघांचा हिशेब केलेला नव्हता.सर्व्हिस सेंटरवर काम नसले की मालक निलेश तांगडी त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा.सध्या कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. यावेळी निलेश तांगडी यांनी दोघा भावांना फोनवरून तसेच घरी येऊन आवणीच्या कामाला चला असा तगादा लावला होता. त्यावेळी घरच्या शेतीचे काम आटोपून आम्हीं कामावर येतो असे सांगितले.मात्र मालक निलेश हा काही ऐकत नव्हता.त्यामुळे दोघा भावांनी शेठ निलेश यास दोन वर्षे काम केल्याचा हिशोब करण्यास सांगितले.याचा राग मनात ठेवून निलेश तांगडी यांनी दोघा भावांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच माझे व्याजासहीत 3 लाख रुपये तुमच्या अंगावर झाले आहेत.ते एका महिन्यात मला परत द्या असे धमकावले.यामुळे राजेश व भिमा यांचे कुटुंब घाबरून अस्वस्थ झाले होते.अखेर या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांची भेट घेऊन त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला.पिडीत तरुणांच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन बाळाराम भोईर यांनी भिवंडी तालुक्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री उशिराने वेठबिगार मुक्ती व ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना दिली असता त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पिडीत राजेश व भीमा भोईर या दोघा भावांना कार्यालयात पाचारण करुन त्यांना वेठबिगार मुक्तीचे दाखले देऊन बंध मुक्त केले आहे.यावेळी भिवंडी शहराध्यक्ष सागर देसक,सचिव मोतीराम नामकुडा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे,ठाणे जिल्हा शेतकरी घटक प्रमुख संगिता भोमटे,ठाणे जिल्हा महिला घटक प्रमुख जया पारधी,भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनिल लोणे,भिवंडी ग्रामीण तालुका उपाध्यक्ष केशव पारधी, कातकरी घटक प्रमुख गुरुनाथ वाघे,भिवंडी शहर उपप्रमुख महेंद्र निरगुडा, युवक उपप्रमुख किशोर हुमणे आदी कार्यकर्ते  उपस्थित होते.या घटनेप्रकरणी मालक निलेश तांगडी याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989  कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास गणेशपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी