शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मनपा प्रशासनाची कचरा ठेकेदारावर मेहरबानी; कोट्यावधींचा खर्च, तरीही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग

By नितीन पंडित | Updated: October 9, 2023 16:21 IST

घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असून शहर स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.विशेष म्हणजे कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी म्हणून कोट्यवधींची यंत्रसामुग्री एक रुपया भाड्याने आंदण देऊनही ठेकेदारावर कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. शहरात मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक ठिकाणी हिंदू व मुस्लिम भागात ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.

शहरात दररोज साडेचारशे टन कचरा उचलला जात असून हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासने आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट् प्रा. लि.या कंपनीस प्रति टन १२२९ रुपये दर निश्चित करून सहा वर्षांसाठी ठेका दिला आहे.यासाठी ठेकेदाराला सुमारे २२ कोटी ७५ लाख ७४ हजार ५२७ रुपये वार्षिक दिले जाणार आहेत.यासाठी मनपाने ठेकेदाराला ५० घंटागाड्या व २३ रेफ्युज कलेक्टर अशी सुमारे १० कोटी रुपयांची वाहनेनाममात्र १ रुपया प्रतिमहा भाडयाने ठेकेदाराला आंदण दिली आहेत.

 घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.मात्र या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने ही कचरा संकलन केंद्र अक्षरशः उकिरडे झाले.त्यांनतर जनाक्रोश वाढल्याने काही ठिकाणी कचरा संकलन बंद करण्यात आली मात्र खडक रोड येथील कचरा संकलन हे मुख्य बाजारपेठेत चहूबाजूने निवासी व व्यापारी अस्थापनांच्या मधोमध आहे. येथे कचरा संकलन केंद्राला डम्पिंगचे स्वरूप आले असून दुर्गंधीने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील भिवंडी कल्याण या मुख्य रस्त्यावर नवी वस्ती जवळ असलेल्या वेलकम हॉटेलसमोर कचऱ्याचा भयंकर ढिग साचला असून शहरात अंतर्गत रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात साचले आहेत.या कचरा कोंडीमुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सध्या नवरात्रीउत्सव तोंडावर आला असतांनाच एन सणाच्या पार्श्वभूमीवर तरी महापालिका नागरिकांच्या आरोग्य समस्याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी