शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
3
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
5
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
6
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
7
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
8
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
9
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
10
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
11
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
12
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
13
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
14
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
15
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
16
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
17
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
18
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
19
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
20
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात

भिवंडी मनपा प्रशासनाची कचरा ठेकेदारावर मेहरबानी; कोट्यावधींचा खर्च, तरीही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग

By नितीन पंडित | Updated: October 9, 2023 16:21 IST

घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असून शहर स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.विशेष म्हणजे कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी म्हणून कोट्यवधींची यंत्रसामुग्री एक रुपया भाड्याने आंदण देऊनही ठेकेदारावर कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. शहरात मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक ठिकाणी हिंदू व मुस्लिम भागात ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.

शहरात दररोज साडेचारशे टन कचरा उचलला जात असून हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासने आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट् प्रा. लि.या कंपनीस प्रति टन १२२९ रुपये दर निश्चित करून सहा वर्षांसाठी ठेका दिला आहे.यासाठी ठेकेदाराला सुमारे २२ कोटी ७५ लाख ७४ हजार ५२७ रुपये वार्षिक दिले जाणार आहेत.यासाठी मनपाने ठेकेदाराला ५० घंटागाड्या व २३ रेफ्युज कलेक्टर अशी सुमारे १० कोटी रुपयांची वाहनेनाममात्र १ रुपया प्रतिमहा भाडयाने ठेकेदाराला आंदण दिली आहेत.

 घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.मात्र या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने ही कचरा संकलन केंद्र अक्षरशः उकिरडे झाले.त्यांनतर जनाक्रोश वाढल्याने काही ठिकाणी कचरा संकलन बंद करण्यात आली मात्र खडक रोड येथील कचरा संकलन हे मुख्य बाजारपेठेत चहूबाजूने निवासी व व्यापारी अस्थापनांच्या मधोमध आहे. येथे कचरा संकलन केंद्राला डम्पिंगचे स्वरूप आले असून दुर्गंधीने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील भिवंडी कल्याण या मुख्य रस्त्यावर नवी वस्ती जवळ असलेल्या वेलकम हॉटेलसमोर कचऱ्याचा भयंकर ढिग साचला असून शहरात अंतर्गत रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात साचले आहेत.या कचरा कोंडीमुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सध्या नवरात्रीउत्सव तोंडावर आला असतांनाच एन सणाच्या पार्श्वभूमीवर तरी महापालिका नागरिकांच्या आरोग्य समस्याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी