शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर 

By नितीन पंडित | Updated: January 1, 2024 18:07 IST

Bhiwandi News: भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या या अभय योजना वसुली मोहिमेत वसुली पथकाने केलेल्या कामगिरी बाबत मनपा आयुक्तांनी समाधान व्यक्त केले असून अशाच प्रकारे कर वसुली करण्याचा सल्ला मनपा आयुक्त जय वैद्य यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी डिसेंबर महिन्यात राबविलेल्या २३ दिवसांच्या मालमत्ता करावरील व्याजात सूट देणाऱ्या अभय योजना कालावधीत तब्बल १२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश मिळाले असून एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४८ कोटी ६८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला असून २०२२ या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ३६ कोटी ६८ लाख रुपये जमा झाले होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची रक्कम ही १२ कोटी रुपयांनी अधिक आहे.

पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी मालमत्ता कर वसुली साठी १६ ते ३१ ऑक्टोंबर दरम्यान राबविलेल्या अभय योजना पहिल्या टप्प्यात १२ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी मालमत्ता कराची वसुली केली.त्यास मिळालेल्या यशा नंतर पालिका प्रशासनाने अभय योजना टप्पा दोन हा ९ ते ३१ डिसेंबर कालावधीत राबवला .या मध्ये १२कोटी ३५ लाख ६७ हजार रुपयांचा मालमत्ता कर गोळा केला आहे.अभय योजनेच्या दोन टप्प्यात मिळून २५कोटी २९ लाख ६७ हजार रुपयांचा महसूल पालिका तिजोरीत जमा झाला आहे.

झोपडपट्टी मालमत्ता धारकांकडून ४४ लाखाची विक्रमी वसुली,आयुक्तांनी केले अभिनंदनपालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने कर वसुली मोहीम जोरात सुरू असून सर्व अधिकारी कर्मचारी भूभाग लिपिक मालमत्ता कर वसुलीसाठी झटत आहेत.त्यामध्ये थकबाकी मालमत्ता धारकांना अभय योजनेचे महत्व पटवून देण्यात पालिका कर्मचारी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विभागातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यात यश मिळाले आहे. प्रभाग समिती क्रमांक दोन मधील झोपडपट्टी विभागामार्फत टेमघर विभाग येथील थकीत झोपडपट्टी मालमत्ता धारक यांच्याकडून मालमत्ता कर वसूल करण्याकरिता सहायक आयुक्त सुधीर गुरव,कार्यालयीन अधीक्षक अनिल आव्हाड,कर निरीक्षक गणेश कामडी,झोपडपट्टी विभाग लिपिक राजेंद्र गायकवाड, शरद भवार,वसंत भोईर व वसुली पथक यांच्या अतोनात प्रयत्नाने  केलेल्या कारवाईअंती रुपये ४४ लाख  ३१ हजार १०० रुपये वसूल करण्यात यशस्वी झाले आहेत.यापूर्वी प्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फैसल तातली, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद पळसुले यांनी याचा पाठपुरावा करून प्रकरण लोक न्यायालयात नेले होते. पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी कर्मचाऱ्यांनी चांगली वसुली केल्या बद्दल सहाय्यक आयुक्त व सर्व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी