शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:51 IST

महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील मुख्य  रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा रविवार बाजार आज ३ एप्रिलच्या रविवारी पुन्हा जोमात भरला होता . त्यामुळे मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . परंतु महापालिके कडून मात्र कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे . येथून एसटी, एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी, अवजड मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.  परंतु मुख्य रस्त्यावरच  बेकायदा रविवार बाजार मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होते . लोकांना चालणे अवघड होते . आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही . अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते व नागरिक  अडकुन पडतात. पालिका मुख्यालय, पोलीस ठाणे ,  बस स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा असतो . फेरीवाले जाताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचराया रस्त्यात टाकून जातात . प्लास्टिक बंदी असून देखील सर्रास प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर केला जातो . 

त्यातच भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयोंच्या तक्रारी होतात . त्यातच सध्या महापालिकेच्या भुयारी गटारच्या कामा मुळे भाईंदर पोलीस ठाण्या पासून पुढे सुभाषचंद्र बोस मैदान पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . त्यामुळे आधीच वाहतुकीची कोंडी त्यात बेकायदा रविवार बाजारा मुळे जाच प्रचंड वाढला आहे . 

ह्या बेकायदा रविवार बाजारा विरुद्ध नगरसेवक अवाक्षर काढताना दिसत नाही . बाजार वसुली ठेकेदारसाठी तर हा बाजार बक्कळ शुल्क वसुलीची पर्वणी असतो . त्यात महापालिका बेकायदा बाजरावर ठोस कारवाई करत नसल्याने एकूणच ह्यात भ्रष्टाचारी संगनमत असल्याचे आरोप होत आले आहेत .  मध्यंतरी काही काळ रविवारी सकाळ पासून पालिकेचे पथक या मुख्य मार्गावर फेरीवाल्यांना बसू देत नव्हते . दुपारी पथक जायचे आणि फेरीवाले पुन्हा बसायचे . परंतु त्यामुळे सकाळ ते दुपार दरम्यान मात्र पालिका मुख्यालया सह मुख्य रस्ता , बस स्थानक वर अतिक्रमण होत नसल्याने रस्ते मोकळे व स्वच्छ दिसत होते .  परंतु आजच्या रविवारी मात्र पालिकेच्या पथकाने कारवाई करण्या ऐवजी फेरीवाल्यांना बसण्यास मोकळे रान दिल्याने पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी आणि जाच नागरिकांना सहन करावा लागला . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर