शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:51 IST

महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील मुख्य  रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा रविवार बाजार आज ३ एप्रिलच्या रविवारी पुन्हा जोमात भरला होता . त्यामुळे मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . परंतु महापालिके कडून मात्र कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे . येथून एसटी, एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी, अवजड मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.  परंतु मुख्य रस्त्यावरच  बेकायदा रविवार बाजार मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होते . लोकांना चालणे अवघड होते . आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही . अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते व नागरिक  अडकुन पडतात. पालिका मुख्यालय, पोलीस ठाणे ,  बस स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा असतो . फेरीवाले जाताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचराया रस्त्यात टाकून जातात . प्लास्टिक बंदी असून देखील सर्रास प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर केला जातो . 

त्यातच भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयोंच्या तक्रारी होतात . त्यातच सध्या महापालिकेच्या भुयारी गटारच्या कामा मुळे भाईंदर पोलीस ठाण्या पासून पुढे सुभाषचंद्र बोस मैदान पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . त्यामुळे आधीच वाहतुकीची कोंडी त्यात बेकायदा रविवार बाजारा मुळे जाच प्रचंड वाढला आहे . 

ह्या बेकायदा रविवार बाजारा विरुद्ध नगरसेवक अवाक्षर काढताना दिसत नाही . बाजार वसुली ठेकेदारसाठी तर हा बाजार बक्कळ शुल्क वसुलीची पर्वणी असतो . त्यात महापालिका बेकायदा बाजरावर ठोस कारवाई करत नसल्याने एकूणच ह्यात भ्रष्टाचारी संगनमत असल्याचे आरोप होत आले आहेत .  मध्यंतरी काही काळ रविवारी सकाळ पासून पालिकेचे पथक या मुख्य मार्गावर फेरीवाल्यांना बसू देत नव्हते . दुपारी पथक जायचे आणि फेरीवाले पुन्हा बसायचे . परंतु त्यामुळे सकाळ ते दुपार दरम्यान मात्र पालिका मुख्यालया सह मुख्य रस्ता , बस स्थानक वर अतिक्रमण होत नसल्याने रस्ते मोकळे व स्वच्छ दिसत होते .  परंतु आजच्या रविवारी मात्र पालिकेच्या पथकाने कारवाई करण्या ऐवजी फेरीवाल्यांना बसण्यास मोकळे रान दिल्याने पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी आणि जाच नागरिकांना सहन करावा लागला . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर