शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:51 IST

महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील मुख्य  रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा रविवार बाजार आज ३ एप्रिलच्या रविवारी पुन्हा जोमात भरला होता . त्यामुळे मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . परंतु महापालिके कडून मात्र कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे . येथून एसटी, एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी, अवजड मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.  परंतु मुख्य रस्त्यावरच  बेकायदा रविवार बाजार मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होते . लोकांना चालणे अवघड होते . आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही . अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते व नागरिक  अडकुन पडतात. पालिका मुख्यालय, पोलीस ठाणे ,  बस स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा असतो . फेरीवाले जाताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचराया रस्त्यात टाकून जातात . प्लास्टिक बंदी असून देखील सर्रास प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर केला जातो . 

त्यातच भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयोंच्या तक्रारी होतात . त्यातच सध्या महापालिकेच्या भुयारी गटारच्या कामा मुळे भाईंदर पोलीस ठाण्या पासून पुढे सुभाषचंद्र बोस मैदान पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . त्यामुळे आधीच वाहतुकीची कोंडी त्यात बेकायदा रविवार बाजारा मुळे जाच प्रचंड वाढला आहे . 

ह्या बेकायदा रविवार बाजारा विरुद्ध नगरसेवक अवाक्षर काढताना दिसत नाही . बाजार वसुली ठेकेदारसाठी तर हा बाजार बक्कळ शुल्क वसुलीची पर्वणी असतो . त्यात महापालिका बेकायदा बाजरावर ठोस कारवाई करत नसल्याने एकूणच ह्यात भ्रष्टाचारी संगनमत असल्याचे आरोप होत आले आहेत .  मध्यंतरी काही काळ रविवारी सकाळ पासून पालिकेचे पथक या मुख्य मार्गावर फेरीवाल्यांना बसू देत नव्हते . दुपारी पथक जायचे आणि फेरीवाले पुन्हा बसायचे . परंतु त्यामुळे सकाळ ते दुपार दरम्यान मात्र पालिका मुख्यालया सह मुख्य रस्ता , बस स्थानक वर अतिक्रमण होत नसल्याने रस्ते मोकळे व स्वच्छ दिसत होते .  परंतु आजच्या रविवारी मात्र पालिकेच्या पथकाने कारवाई करण्या ऐवजी फेरीवाल्यांना बसण्यास मोकळे रान दिल्याने पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी आणि जाच नागरिकांना सहन करावा लागला . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर