शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

भातसा धरण प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:54 IST

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरण प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित आहे.

कसारा : मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरण प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा या मागणीसाठी मंगळवारी, सिंचन भवन कार्यालय, ठाणे येथे भातसा धरण प्रकल्पविस्थापित समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष भाऊ महाळुंगे यांच्या नेतृत्वाखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगदीश धोडी यांनी गेली ५० वर्षे रखडलेल्या विस्थापितांच्या पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.या प्रकल्पासाठी १९६९ मध्ये खाजगी आणि वनजमीन भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात येऊन १९७३ मध्ये धरण बांधून पूर्ण करण्यात आले होते. यावेळी भूसंपादनांची प्रक्रि या सुरवातीस बृहन्मुंबई महानगरपालिका आणि त्यानंतर शासनाने केली. या बुडीत क्षेत्रासाठी ४४४.७३ हेक्टर खाजगी आणि २६२५ हेक्टर वनजमीन संपादित करण्यात आली होती.भातसा धरणासाठी बुडीत क्षेत्रातील पाल्हारी, पाचिवडे, घोडेपाऊल, वाकीचा पाडा, पळसपाडा अशी ३ गावे आणि २ पाडे यांची संपूर्ण जमीन तसेच घरे संपादित करण्यात आली होती. या प्रकल्पात एकूण ९७ कुटुंबे, आणि २८६ खातेदार यांसह एकूण ५७८ व्यक्ती बेघर झाल्या आहेत. मात्र, यापैकी फक्त ४७ लोकांनाच प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात आले आहेत. १९७३ पासून सत्याग्रह, आंदोलने, मोर्चे, बैठकांद्वारे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त करीत आहेत. परंतु प्रकल्पग्रस्तांसाठी उदासीनता दाखवत असल्याने ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे.प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना कायम आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलू. - जगदीश धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, पालघर उपजिल्हाप्रमुख, शिवसेनाअनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे; परंतु आमच्याकडे कोणी गांभीर्याने बघत नाही. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला २ रु .चा कागद दिला की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात. मात्र, गेली ५० वर्षे आमच्या पुनर्वसनाचा शासनाला विसर पडला आहे.- भाऊ बाबू महाळुंगे,अध्यक्ष, भातसा प्रकल्पग्रस्त समिती

टॅग्स :Damधरणwater transportजलवाहतूक